Maharashtra State Service Preliminary Examination 2018 Paper 1 Series A

Total Questions : 100Maximum Marks : 200

प्र.१. यादी I आणि यादी II याच्या जोड्या जुळवा आणि योग्य पर्याय निवडा :

यादी Iयादी II

अ.अर्डकुंडेI.अलेक्झांडर व्हॉन हंबोल्ट

ब.अन्थ्रोपोजिओग्राफ़ीII.जीन ब्रुन्स

क.जिऑग्राफ़िया ह्युमेनाIII.कार्ल रिटर

ड.कॉसमॉसIV.फ्रेडरिक रॅटझेल


पर्याय उत्तरे :



(1)IIIIIIIV

(2)IVIIIIII

(3)IIIIVIII

(4)IIIIIVII

उत्तर :

प्र.२. खालील विधानांची सत्यता तपासा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा :

विधान 'अ' : पृथ्वी 24 तासामध्ये 360॰ रेखांशात फिरते.

विधान 'ब' : प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला चार मिनिटाचा कालावधी लागतो.

(1) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत

(2) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत

(3) विधान 'अ' बरोबर असून विधान 'ब' चूक आहे

(4) विधान 'अ' चूक असून विधान 'ब' बरोबर आहे

उत्तर :

प्र.३. खालीलपैकी कोणते भूरूप भू-अंतर्गत शक्तींचा परिणाम नाही ?

(1) ग्रॅॅबन

(2) गट पर्वत

(3) अवशिष्ट पर्वत

(4) खचदरी

उत्तर :

महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा तयारी

प्र.४. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेल्या भुरुपाच्या खालील आकृत्यांचा योग्य पर्याय निवडा :

Jwalamukhi



(1)अॅॅसिड लाव्हा शंकूसंमिश्र शंकूसिंडर शंकूबेसिक लाव्हा शंकू

(2)बेसिक लाव्हा शंकूसिंडर शंकूसंमिश्र शंकूअॅॅसिड लाव्हा शंकू

(3)अॅॅसिड लाव्हा शंकूबेसिक लाव्हा शंकूसिंडर शंकूसंमिश्र शंकू

(4)सिंडर शंकूअॅॅसिड लाव्हा शंकूबेसिक लाव्हा शंकूसंमिश्र शंकू

उत्तर :

प्र.५. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा.

(1) पश्चिमी वारे, व्यापारी वारे, ध्रुवीय वारे

(2) व्यापारी वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे

(3) व्यापारी वारे, ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे

(4) ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे, व्यापारी वारे

उत्तर :

प्र.६. खाली दोन विधाने आहेत. त्यापैकी (अ) हे विधान असून (र) हे त्याचे कारण आहे.खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

विधान 'अ' : विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते.

विधान 'ब' : विषुववृत्तीय प्रदेश हा अति पर्जन्यमान, आभ्राच्छादित आकाश आणि आद्रता हि वैशिष्ट्ये असलेला आहे.

(1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.

(2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.

(3) (अ) सत्य असून (र) असत्य आहे.

(4) (अ) असत्य असून (र) सत्य आहे.

उत्तर :

प्र.७. खालीलपैकी कोणता रासायनिक विदारणाचा प्रकार नाही ?

(1) द्रवीकरण

(2) भस्मिकरण (ऑकसीडेशन)

(3) कर्बाल क्रिया (कार्बोनेशन)

(4) क्षरण क्रिया

उत्तर :

प्र.८. खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :

विधान 'अ' : विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले वाष्पाचे असलेले प्रमाण म्हणजे त्या त्या हवेची सापेक्ष आर्द्रता होय.

विधान 'ब' : हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावर त्या हवेची कमाल वाष्प धारण शक्ती यांच्या गुणोत्तराला विशिष्ट आर्द्रता म्हणतात.

(1) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत

(2) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत

(3) विधान 'अ' बरोबर असून विधान 'ब' चूक आहे

(4) विधान 'अ' चूक असून विधान 'ब' बरोबर आहे

उत्तर :

प्र.९. खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :

विधान 'अ' : सागरी क्षेत्रात समतापरेषा एकमेकीस व अक्षवृत्तास जवळजवळ समांतर जातात.

विधान 'र' : सागरी स्थानांचे तापमान उंचीच्या परिणामांपासून मुक्त असते.

(1) (अ) आणि (र) दोन्ही बरोबर आहेत आणि (र) हे (अ) चे अचूक स्पष्टीकरण आहे.

(2) (अ) आणि (र) दोन्ही बरोबर आहेत आणि (र) हे (अ) चे अचूक स्पष्टीकरण नाही.

(3) (अ) हे बरोबर आहे परंतु (र) हे चूक आहे.

(4) (अ) हे चूक आहे परंतु (र) हे बरोबर आहे.

उत्तर :

प्र.१०. खालील विधानांचा विचार करुन बिनचूक पर्यायांची निवड करा.

अ.ज्या ठिकाणी खंडात उतार अतिशय रुंद असतो, त्या क्षेत्रामध्ये मत्स्य क्षेत्रे तयार होतात.

ब.उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे.

क.उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहांच्या मिश्रणामधुन माश्यांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते.

ड.भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारांपेक्षा अधिक महत्वाची आहे.

पर्याय उत्तरे :

(1)विधाने अ आणि ब सत्य आहेत

(2)विधाने अ आणि क सत्य आहेत

(3)विधाने ब, क आणि ड सत्य आहेत

(4)विधाने अ, ब आणि क सत्य आहेत

उत्तर :

प्र.११. विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप ____________ असतो.

(1) अरुंद पाया आणि रुंद माथा

(2) रुंद पाया आणि रुंद माथा

(3) रुंद पाया आणि अरुंद माथा

(4) अरुंद पाया आणि अरुंद माथा

उत्तर :

प्र.१२. खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा :

विधान 'अ' : भारताचा काही भू-भाग उत्तर गोलार्धात असून काही भू-भाग दक्षिण गोलार्धात आहे.

विधान 'ब' : भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7500 कि.मी.पेक्षा हि जास्त आहे.

(1) विधाने 'अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत

(2) विधाने 'अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत

(3) विधान 'अ' बरोबर असून विधान 'ब' चूक आहे

(4) विधान 'अ' चूक असून विधान 'ब' बरोबर आहे

उत्तर :

प्र.१३. खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा :

विधान 'अ' : हिमालयीन नद्या या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालिक टेकड्या पार करुन मैदानी प्रदेशात प्रवेश करतात.

विधान 'ब' : प्रायद्विपीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खचदऱ्यातून वाहतात.

(1) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत

(2) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत

(3) विधान 'अ' बरोबर असून विधान 'ब' चूक आहे

(4) विधान 'अ' चूक असून विधान 'ब' बरोबर आहे

उत्तर :

प्र.१४. पर्जन्यप्रदेश आणि पर्जन्यछायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्ये आहेत ?

(1) आवर्ते पर्जन्य

(2) अभिसरण पर्जन्य

(3) प्रतिरोध पर्जन्य

(4) औष्णिक पर्जन्य

उत्तर :

प्र.१५. खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रदेशाची आहेत ?

अ.जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे

ब.नारळाचे उत्पादन घेतले जाते

क.मासेमारीसाठी अनुकूल असतो

ड.पर्यटकांसाठी आकर्षक असतो

पर्याय उत्तरे :

(1)उत्तर-भारतीय मैदानी प्रदेश

(2)प्रायद्विपीय पठारी प्रदेश

(3)किनारवर्ती प्रदेश

(4)हिमालयीन प्रदेश

उत्तर :

प्र.१६. UNEP च्या नियमाप्रमाणे खालील प्रदूषक आणि त्यांच्या माध्यमांच्या जोड्या जुळवा :

प्रदूषकमाध्यम

अ.नायट्रोजन ऑक्साईडI.समुद्र

ब.पेट्रोलियम हायड्रोकार्बनII.अन्न

क.फ्लोराइडIII.हवा

ड.मायकोटॉक्सीन्सIV.स्वच्छ पाणी


पर्याय उत्तरे :



(1)IIIIIIIV

(2)IVIIIIII

(3)IIIIIVII

(4)IIIIIIIIIV

उत्तर :

प्र.१७. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला आहे ?

(1) 1 जून

(2) 5 जून

(3) 1 सप्टेंबर

(4) 16 सप्टेंबर

उत्तर :

प्र.१८. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानवनिर्मित आहे ?

(1) मिथेन

(2) कार्बन डायऑक्साईड

(3) नायट्रस ऑक्साईड

(4) क्लोरोफ्लूरोकार्बन

उत्तर :

प्र.१९. दोन लगतच्या जीव समुदायातील संक्रमणात्मक प्रदेश __________ म्हणून ओळखला जातो ?

(1) इको-झोन

(2) इको-पॉज

(3) इको-टोन

(4) इको-टाईप

उत्तर :

प्र.२०. खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामामुळे जागतिक हवामानात बदल होतो ?

अ.8000 वर्षांपासून होणारी जंगलतोड

ब.आग आणि अतीचरण ह्यांचा वापर

क.5000 वर्षांपासून होणारी खाचरातली भातशेती

ड.औद्योगिक क्रांती

पर्याय उत्तरे :

(1)फक्त ड

(2)फक्त क आणि ड

(3)फक्त ब, क आणि ड

(4)वरीलपैकी सर्व

उत्तर :

प्र.२१. दुसऱ्या पंचवार्षिक योजनाकाळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह्पोलाद कारखाना सुरु करण्यात आला नाही ?

अ.राउरकेला (ओरिसा)

ब.भिलाई (छत्तिसगड)

क.दुर्गापूर (प.बंगाल)

ड.बोकोरो (झारखंड)

पर्याय उत्तरे :

(1)फक्त अ आणि ब

(2)फक्त क

(3)फक्त ड

(4)फक्त अ आणि ड

उत्तर :

प्र.२२. किंमतवाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही ?

अ.निर्यातवाढ

ब.साठा

क.पतनिर्मितीत वाढ

ड.दुष्काळ

पर्याय उत्तरे :

(1)फक्त अ आणि ब

(2)फक्त क आणि ड

(3)फक्त ड

(4)फक्त क

उत्तर :

प्र.२३. पुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्यनिर्मितीस कारणीभूत नाही ?

अ.भाववाढ

ब.शासकीय खर्चात वाढ

क.तुटीचा अर्थभरणा

ड.अल्प बचती व भांडवलनिर्मिती

पर्याय उत्तरे :

(1)फक्त अ आणि क

(2)फक्त अ, क आणि ड

(3)फक्त ब आणि ड

(4)फक्त ब आणि क

उत्तर :

प्र.२४. "किमान जीवनाश्यक गरजांची पुर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव" याचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो ?

(1) निरपेक्ष दारिद्र्य

(2) सापेक्ष दारिद्र्य

(3) वरील दोन्ही

(4) यापैकी नाही

उत्तर :

प्र.२५. अन्न सुरक्षा कायदा, 2013 च्या संदर्भात पुढीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा.

अ. हा कायदा 75 % ग्रामीण व 50 % शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करुन देतो.

ब.लाभार्थ्यांना दरमहा प्र.कि. ₹ 3 प्रमाणे तांदूळ, प्र.कि.₹ 2 प्रमाणे जाडेभरडे धान्य व प्र.कि. ₹ 1 प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे.

पर्याय उत्तरे :

(1)दोन्ही अ आणि ब बरोबर

(2)दोन्ही अ आणि ब चूक

(3)फक्त अ बरोबर

(4)फक्त ब बरोबर

उत्तर :

प्र.२६. भारतीय जनगणना अहवाल, 2011 नुसार एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के भारतीय लोकसंख्या आहे ?

(1) 16.5 टक्के

(2) 17.3 टक्के

(3) 17.5 टक्के

(4) 17.7 टक्के

उत्तर :

प्र.२७. पुढीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचे विवाहाचे किमान वय 21 वर्षे व स्त्रियांचे किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले ?

(1) राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 1976

(2) राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 1977

(3) राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000

(4) लोकसंख्या भविष्यवेध (2001 - 2026)

उत्तर :

प्र.२८. भारत सरकारने पुढीलपैकी कोणते कार्यक्रम 'सामाजिक सुरक्षा' या उद्देशाने सुरु केले आहे ?

अ.आम आदमी विमा योजना

ब.राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना

क.राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम

पर्याय उत्तरे :

(1)फक्त अ आणि ब

(2)फक्त ब आणि क

(3)फक्त क

(4)वरील सर्व

उत्तर :

प्र.२९. हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे (GNI) मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत ?

अ.राष्ट्रीय उत्पन्न

ब.नैसर्गिक संसाधनांमध्ये घट

क.पर्यावरणीय ऱ्हास

पर्याय उत्तरे :

(1)फक्त अ आणि क

(2)फक्त अ

(3)फक्त अ आणि ब

(4)वरील सर्व

उत्तर :

प्र.३०. 'सहस्त्रक विकास लक्ष्ये (MDGs)' यांमध्ये पुढीलपैकी कशाचे मापन केले जाते ?

अ.दारिद्र्य व भुक

ब.महिला सबलीकरण

क.पर्यावरणीय शाश्वतता

ड.विकासासाठी जागतिक भागीदारी

पर्याय उत्तरे :

(1)फक्त अ आणि ब

(2)फक्त क आणि ड

(3)फक्त अ, ब आणि क

(4)वरील सर्व

उत्तर :

प्र.३१. महिला व बालकल्याण योजनांमध्ये पुढीलपैकी कोणत्या योजनांचा समावेश होतो ?

अ.अंगणवाडी सेवा योजना

ब.प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

क.राष्ट्रीय पोषण अभियान

ड.बाल सुरक्षा योजना

पर्याय उत्तरे :

(1)फक्त अ आणि ब

(2)फक्त क आणि ड

(3)फक्त अ, ब आणि क

(4)वरील सर्व

उत्तर :

प्र.३२. दारिद्य घटविण्याच्या कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठीत रोजगार ह्या दोन गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे, कारण

अ.ग्रामीण भागात स्वयंरोजगार हा जास्त प्रचलित आहे.

ब.वेतनरोजगारावरील अवलंबित्व हे मालकांवरील (एम्प्लॉयर) अवलंबित्व वाढवते.

क.असे केले नाही तर श्रीमंत व गरिबांमधील दरी वाढेल.

ड.श्रीमंतांची मालमत्ता संसाधने वाढतील

पर्याय उत्तरे :

(1)फक्त अ आणि ब

(2)फक्त ब आणि क

(3)फक्त क आणि ड

(4)वरील सर्व

उत्तर :

प्र.३३. 'मानवी दारिद्र्य निर्देशांक' ही संकल्पना सर्वप्रथम __________ या अहवालात मांडली गेली ?

(1) मानव विकास अहवाल, 1990

(2) मानव विकास अहवाल, 1997

(3) मानव विकास अहवाल, 2001

(4) मानव विकास अहवाल, 2014

उत्तर :

प्र.३४. 'शिरगणनात्मक शहरे' यांची झालेली भरमसाठ वाढ हे एक मोठे आव्हान आहे कारण अशा शहरांमध्ये

अ.शहर अनुशासन संरचना नसतात

ब.आवश्यक त्या नागरी पायाभूत सुविधा नसतात

क.शहरांची वाढ ही वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे झालेली असते

पर्याय उत्तरे :

(1)अ, ब आणि क

(2)अ आणि ब

(3)ब आणि क

(4)अ आणि क

उत्तर :

प्र.३५. बाराव्या पंचवार्षिक योजनेचे (2012 - 17) मुख्य उद्दिष्ट कोणते होते ?

(1) आर्थिक वृद्धी व स्थिर विकास साधणे

(2) जलद वृद्धी व विकास साधणे

(3) जलद व अधिक सर्वसमावेशक वृद्धी साधणे

(4) जलद, शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी साधणे

उत्तर :

प्र.३६. खालीलपैकी काय जिओस्टेशनरी ऑरबिट (GEO) चे अचूकपणे वर्णन करते ?

(1) समुद्रसपाटीपासूनची उंची 20,000 कि.मी. व एक कक्षा परिभ्रमणास 12 तास लागतात.

(2) समुद्रसपाटीपासूनची उंची 36,000 कि.मी. व एक कक्षा परिभ्रमणास 90 मिनिटे लागतात.

(3) समुद्रसपाटीपासूनची उंची 400 कि.मी. व एक कक्षा परिभ्रमणास 24 तास लागतात.

(4) यापैकी कुठलेही नाही.

उत्तर :

प्र.३७. फ्रेसनल्स बायाप्रिझम मध्ये (λ) तरंगलांबीची किंमत कशावर अवलंबून असते ?

(1) दोन संलग्न उगमस्थानातील अंतर

(2) फ्रिंजची रुंदी

(3) स्लिट व दूरदर्शकाची नेत्रकाच यांतील अंतर

(4) वरील सर्व

उत्तर :

प्र.३८. ज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुतम अंतर 50 cm आहे, अशा व्यक्तीच्या चष्म्याच्या भिंगाचे नाभीय अंतर किती असेल ?

(1) 50 cm, अंतर्व्रक

(2) 50 cm, बहिर्व्रक

(3) 25 cm, अंतर्व्रक

(4) 25 cm, बहिर्व्रक

उत्तर :

प्र.३९. 10 ओहमचा रोध 12 V च्या विद्युतपटास जोडल्यास रोधातून 1.1 A विद्युतधारा वाहते. विद्युतघटाचा अंतर्गत रोध काढा.

(1) 10 Ω

(2) 0.1 Ω

(3) 10.9 Ω

(4) 0.91 Ω

उत्तर :

प्र.४०. एकमेकांपासून 1 मिलिमीटर अंतरावर असलेली दोन समांतर रेखाच्छिद्र पडद्यापासून 1 मीटर अंतरावर ठेवलेल्या आहेत. त्यांच्यावर 500 नॅनोमीटर तरंगलांबीची शलाका सोडल्यावर पडद्यावर व्यक्तीकरण परीणामामुळे तयार झालेल्या पंक्तीमधील अंतर किती ?

(1) 5.0 mm

(2) 0.5 mm

(3) 5.0 cm

(4) 0.05 mm

उत्तर :

प्र.४१. एका वाफेच्या इंजिनला 3.6 x 109 J/min दराने उष्णता पुरवली जाते. त्यापासून इंजिन 5.4 x 108 J/min दराने कार्य करते. अशा इंजिनची कार्यक्षमता किती टक्के असेल ?

(1) 15 %

(2) 12.5 %

(3) 85 %

(4) 87.5 %

उत्तर :

प्र.४२. काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड व खोलवर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येतो. अशा रोगाला ________ म्हणतात ?

(1) एक्झांथिमा

(2) पांढरा डोळा

(3) डायबॅक

(4) पेशिमृत होणे

उत्तर :

प्र.४३. सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम किती ATP तयार होतात ?

(1) 37

(2) 44

(3) 60

(4) 50

उत्तर :

प्र.४४. दोन नावे (बायनोमिनल) देण्याची वर्गीकरण पद्धती कोणी सुचवली ?

(1) कॅॅरोलस लीनायस

(2) बेंथम आणि हुकर

(3) थिओफ्रास्टस

(4) हचिनसन

उत्तर :

प्र.४५. सर जे.सी. बोस, भारतीय वैज्ञानिक, यांच्यानुसार कॉर्टिकल थरांच्या आतील जिवंत पेशीमुळे असेंट ऑफ सॅॅप ____________ ह्या क्रियेमुळे घडते ?

(1) पल्सेटरी क्रिया

(2) ट्रांसपिरेशन पूल सिद्धांत

(3) कोहीजन सिद्धांत

(4) मूळ दाब सिद्धांत

उत्तर :

प्र.४६. खालीलपैकी कोणती थेरीज किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहेत ?

अ.नैसर्गिक निवडीचा सिद्धांत

ब.उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत

क.वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांत

ड.वियोग सिद्धांत

पर्याय उत्तरे :

(1)अ, ब आणि ड

(2)अ, ब आणि क

(3)अ, क आणि ड

(4)वरील सर्व

उत्तर :

प्र.४७. खालीलपैकी कोणती 'संप्रेरके' पिटुुटरी ग्रंथीची आहेत ?

अ.टि.एस.एच.

ब.एस.टि.एच.

क.एच.सी.जी.

ड.ए.डी.एच.

पर्याय उत्तरे :

(1)अ आणि ब

(2)ब आणि क

(3)अ, ब आणि ड

(4)अ, ब आणि क

उत्तर :

प्र.४८. अस्थिसंस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते ?

अ.संरक्षण

ब.रक्तोपादन/रुधिरजनन

क.हालचाल सुलभता

ड.क्षाराचे संवर्धन/साठा

पर्याय उत्तरे :

(1)अ, ब आणि क

(2)ब, क आणि ड

(3)अ, क आणि ड

(4)वरील सर्व

उत्तर :

प्र.४९. ग्रिगोर मेंडल यांना जनुकशास्त्राचे जनक असे संबोधले जाते, कारण त्यांनी प्रथम अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. त्यांचे प्रयोगशाळेतील संशोधन सामग्री कोणती होती ?

(1) फ्रुट फ्लाय (फळ माशी)

(2) ब्रेड मोल्ड (बुरशी)

(3) वाटाण्याचे झाड

(4) रेसुस माकड

उत्तर :

प्र.५०. 'M' हे मुलद्रव्य डोबेरीनर त्रिक्के मध्ये Ca, M आणि Ba हे _________ आहे ?

(1) Be

(2) Mg

(3) Sr

(4) I

उत्तर :

प्र.५१. काष्ठजन्य अल्कोहोल म्हणजेच

(1) मिथेनॉल

(2) इथेनॉल

(3) बेंझिल अल्कोहोल

(4) आयसोप्रोपिल अल्कोहोल

उत्तर :

प्र.५२. पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण

(1) ऑक्सिजन चे प्रमाण वाढते

(2) जंतूना मारणे

(3) गाळ काढण्यासाठी

(4) न विरघळणारी अशुध्दतता घालवण्यासाठी

उत्तर :

प्र.५३. ___________ ह्यामुळे गंजण्याची क्रिया होते.

(1) फक्त भौतिक अभिक्रिया

(2) फक्त रासायनिक अभिक्रिया

(3) दोन्ही (1) व (2)

(4) कोणतीही नाही

उत्तर :

प्र.५४. नैसर्गिक वायुमध्ये __________ चे प्रमाण मुख्यत्वे करुन असते.

(1) ब्युटेन

(2) प्रोपेन

(3) मिथेन

(4) इथेन

उत्तर :

प्र.५५. नैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते ?

(1) कार्बोदके

(2) लिपिड

(3) प्रथिन

(4) टर्पिन

उत्तर :

प्र.५६. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतूदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या ?

अ.नागरिकत्व

ब.निवडणूका (कलम-324)

क.तात्पुरती संसद

ड.मूलभूत अधिकार

पर्याय उत्तरे :

(1)अ, ब आणि क

(2)ब, क आणि ड

(3)अ आणि क

(4)अ आणि ब

उत्तर :

प्र.५७. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला ?

(1) शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार

(2) गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य

(3) केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य

(4) मिनर्व्हा मिल्स लि. विरुद्ध भारत सरकार

उत्तर :

प्र.५८. भारताच्या उपराष्ट्रपती बाबत खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?

अ.या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो.

ब.ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थिती मध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात.

क.या पदाच्या निवडणूकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक असते.

पर्याय उत्तरे :

(1)

(2)

(3)

(4)यापैकी एकही नाही

उत्तर :

प्र.५९. खालील विधाने विचारात घ्या :

अ.विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत.

ब.पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात.

क.प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो.

ड.दोन किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकींचे अध्यक्षस्थान केन्द्रीय गृहमंत्री भूषवतो.

पर्याय उत्तरे :

(1)विधाने अ, ब आणि क बरोबर

(2)विधाने ब, क आणि ड बरोबर

(3)विधाने अ, क आणि ड बरोबर

(4)विधाने क आणि ड बरोबर

उत्तर :

प्र.६०. स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या सहाव्या अहवालातील शिफारशी ________ आहेत.

अ.एक दशलक्ष लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये समान महानगरीय वाहतूक प्राधिकरण निर्माण करण्यात यावे.

ब.स्थानिक संस्था लोकपाल-लोकायुक्त स्थापन करावेत.

क.महापौरांची सरळ निवड.

ड.जिल्हा मंडळे स्थापन करावीत आणि त्यांचे मुख्य सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कार्य करावे.

पर्याय उत्तरे :

(1)अ, ब आणि क

(2)ब, क आणि ड

(3)अ, क आणि ड

(4)अ, ब, क आणि ड

उत्तर :

प्र.६१. खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती, परंतु त्यांचा समावेश नंतर घटनादुरुस्तीद्वारे झाला ?

अ.उत्पन्नातील विषमता कमी करणे.

ब.पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्य जीवसृष्टीचे रक्षण करणे.

क.समान कामांबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन.

ड.समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य.

ई.सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधणे सुरक्षित करणे.

पर्याय उत्तरे :

(1)अ, ब आणि क

(2)ब, क आणि ड

(3)क, ड आणि ई

(4)अ, ब आणि ड

उत्तर :

प्र.६२. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

अ.संसद कर वाढवू शकते.

ब.संसद कर कमी करु शकत नाही.

क.संसद कर रद्द करु शकते.

ड.संसद कर वाढवू शकत नाही.

ई.संसद कर कमी करु शकते.

पर्याय उत्तरे :

(1)अ, क आणि ई

(2)ब, क आणि ड

(3)क, ड आणि ई

(4)क आणि ड

उत्तर :

प्र.६३. शून्य प्रहराच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?

अ.संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही नाविन्यपूर्ण संकल्पना भारतामध्ये उदयास आली.

ब.प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्या मधल्या काळाला शून्य प्रहर म्हणतात.

क.ही संकल्पना 1962 पासून प्रत्यक्षात आली.

ड.शून्य प्रहर हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले अनौपचारिक स्वरुपाचे माध्यम आहे.

पर्याय उत्तरे :

(1)अ, ब आणि क

(2)अ, क आणि ड

(3)ब आणि क

(4)वरील सर्व

उत्तर :

प्र.६४. खालिल विधाने लक्षात घ्या :

अ.राज्यघटनेच्या नवव्या विभागातील तरतूदी ह्या पाचव्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रांस लागू नाही.

ब.पाचव्या परिशिष्टांत समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रांत सात राज्यांचा समावेश होतो.

क.1996 मध्ये संसदेने अश्या क्षेत्रांसाठी PESA कायदा मंजूर केला.

पर्याय उत्तरे :

(1)अ आणि ब

(2)अ आणि क

(3)फक्त अ

(4)वरील सर्व

उत्तर :

प्र.६५. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनास दिली आहे ?

(1) कलम 343

(2) कलम 348

(3) कलम 350

(4) कलम 351

उत्तर :

प्र.६६. भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे मानधन, भत्ता, विशेषाधिकार आणि इतर बाबी यांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणता पदाधिकारी यांत समाविष्ट नाही ?

(1) विधानसभेचे उपसभापती

(2) विधानपरिषदेचे उपाध्यक्ष

(3) भारताचा महाधिवक्ता

(4) भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक

उत्तर :

प्र.६७. खालिलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

अ.लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सभासद असतात.

ब.राज्यसभेवर अॅंग्लो इंडियन ह्या जमातीचे दोन सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे.

क.किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेचे कोणतेही बंधन नाही.

ड.नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा दोन्ही निवडणूकीत मतदान करु शकतात.

पर्याय उत्तरे :

(1)अ आणि ब

(2)क आणि ड

(3)फक्त ब

(4)फक्त क

उत्तर :

प्र.६८. योग्य कथन/कथने ओळखा :

अ.काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत.

ब.काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत.

पर्यायी उत्तरे :

(1)फक्त अ

(2)फक्त ब

(3)अ आणि ब दोन्हीही

(4)अ आणि ब दोन्हीही नाही

उत्तर :

प्र.६९. योग्य कथन/कथने ओळखा :

अ.नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात.

ब.नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात.

क.परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात.

ड.परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात.

पर्यायी उत्तरे :

(1)फक्त अ, ब आणि क

(2)फक्त अ, ब आणि ड

(3)फक्त अ आणि ब

(4)फक्त अ, क आणि ड

उत्तर :

प्र.७०. योग्य क्रमानुसार लावा (राज्यांची निर्मिती) :

अ.मिझोरम

ब.नागालँड

क.मेघालय

ड.महाराष्ट्र

पर्यायी उत्तरे :

(1)अ, ड, ब, क

(2)ड, ब, क, अ

(3)क, ड, ब, अ

(4)ड, ब, अ, क

उत्तर :

प्र.७१. उच्च शिक्षण नियंत्रक यंत्रणे संबंधी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

(1) 2005 सालच्या सैम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ज्ञान आयोगाने उच्च शिक्षण संस्थांसाठी स्वतंत्र नियामक यंत्रणे ची शिफारस केली होती.

(2) यशपाल समिती ने ही उच्च शिक्षण संस्थांच्या नियमनासाठी स्वतंत्र नियामक यंत्रणे ची शिफारस केली होती.

(3) सध्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील नियामक यंत्रणे ऐवजी एकच नियामक यंत्रणा उच्च शिक्षण क्षेत्रात केंद्र शासनाने प्रस्तावित केली आहे. ती यंत्रणा म्हणजे उच्च शिक्षण सक्षमीकरण नियामक यंत्रणा (HEERA).

(4) सध्याच्या काळात उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) हे एकमेव अस्तित्वात असलेली नियामक यंत्रणा आहे.

उत्तर :

प्र.७२. पुढीलपैकी योग्य विधान/ने निवडा :

अ.भारतामध्ये प्रत्येकी एक हजार लोकसंख्येमागे एक पेक्षा कमी डॉक्टर उपलब्ध आहे.

ब.जागतिक आरोग्य संघटनेनुसार डॉक्टर आणि लोकसंख्येचे किमान प्रमाण 3:1000 (1000 लोकांसाठी 3 डॉक्टर) असे असावे.

पर्यायी उत्तरे :

(1)फक्त अ

(2)फक्त ब

(3)अ आणि ब दोन्हीही

(4)अ आणि ब दोन्हीही नाही

उत्तर :

प्र.७३. भारताच्या परराष्ट्र धोरणांपैकी 'पूर्वलक्षी कृती धोरणा'संबंधी विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

(1) हे धोरण भारताच्या विस्तारीत शेजारी देश म्हणजेच आशिया-पॅॅसिफिक प्रदेशावर भर देते.

(2) हे धोरण मुळात आर्थिक पुढाकार म्हणून आखण्यात आले.

(3) या धोरणाने आशिया-पॅॅसिफिक प्रदेशाशी ईशान्य प्रांतातून सुधारीत संपर्काचा पुरस्कार केला आहे.

(4) या धोरणाने कृतीशील राजनयाचा पुरस्कार करत आशिया-पॅॅसिफिक आणि भारतीय सागरी प्रदेशातील घुसखोरीला आळा घालण्यासाठी राजकीय आणि लष्करी हस्तक्षेपाचाही पुरस्कार केला आहे.

उत्तर :

प्र.७४. 'ज्ञानपीठ' पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या :

अ.हा पुरस्कार भारत सरकार द्वारा 1952 पासून प्रायोजित आहे.

ब.1982 च्या अगोदर लेखकाच्या एका कृतीबद्दल दिला जात होता.

क.आता लेखकाच्या जीवनातील योगदानाबद्दल दिला जातो.

ड.2017 चा पुरस्कार कृष्णा सोबती यांना घोषित झाला आहे.

पर्यायी उत्तरे :

(1)अ ब आणि क

(2)ब, क आणि ड

(3)अ आणि ड

(4)अ, ब, क आणि ड

उत्तर :

प्र.७५. 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

(1) एन.के.सिंग

(2) एन.के.मिश्रा

(3) एन.के.राजन

(4) एन.के.त्यागी

उत्तर :

प्र.७६. पुढील विधानांपैकी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) विषयीचे कोणते विधान चुकीचे आहे ?

(1) या प्राधिकरणाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत.

(2) या प्राधिकरणाची स्थापना 1975 साली झाली आहे.

(3) महानगर आयुक्तांची नेमणूक केंद्र शासन करते.

(4) या प्राधिकरणाने दळणवळण, गृह निर्माण, पाणीपुरवठा आणि पर्यावरण या विभागांमध्ये सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

उत्तर :

प्र.७७. डॉ. धीरेन्द्रपाल सिंह इतक्यात बातम्यांमध्ये होते. त्यांच्याबाबत काय खरे नाही ?

(1) ते नॅॅक (राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद) चे संचालक होते.

(2) ते बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरु होते.

(3) ते भारतीय विज्ञान संस्थेचे संचालक होते.

(4) त्यांची UGC च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.

उत्तर :

प्र.७८. महाराष्ट्रातील डॉ.अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशाशी संबंधित आहे ?

(1) आदिवासी भागातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये चौरस आहार पुरवण्याबाबत.

(2) आदिवासी भागातील माध्यमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना चौरस आहार पुरवण्याबाबत.

(3) आदिवासी भागातील गर्भवती आणि स्तनदा मातांना चौरस आहार पुरवण्याबाबत.

(4) अंगणवाडी सेविकांना चौरस आहार पुरवण्याबाबत.

उत्तर :

प्र.७९. जोड्या लावा :

(लेखक)(पुस्तके)

अ.शशी थरूरI.घाचर घोचर

ब.रघुराम राजनII.द एन्ड ऑफ कर्मा

क.सोमीनी सेनगुप्ताIII.आय डू व्हाट आय डू

ड.विवेक शानबागIV.द इरा ऑफ डार्कनेस



(1)IVIIIIII

(2)IVIIIIII

(3)IIIIVIII

(4)IIIIVIII

उत्तर :

प्र.८०. 2017 साहित्याचे नोबेल परितोषिक काझुओ इशिगुरो यांना मिळाले आहे. पुढीलपैकी कोणती साहित्यकृती त्यांची नाही ?

अ.द रिमेन्स ऑफ द डे

ब.ए पेल व्हू ऑफ हिल्स

क.अॅॅन आर्टिस्ट ऑफ द फ्लोटिंग वर्ल्ड

ड.नॉर्वेजियन वूड

इ.काफ्का ऑन द शोअर

पर्यायी उत्तरे :

(1)अ ब, क, ड, इ

(2)ब, क आणि ड

(3)ब, क आणि इ

(4)ड आणि इ

उत्तर :

प्र.८१. अयोग्य विधान ओळखा.

अ.प्रथम जागतिक सायबर स्पेस परिषद लंडन येथे 2011 मध्ये आयोजित केली गेली.

ब.चौथी जागतिक सायबर स्पेस परिषद बुडापेस्ट येथे 2015 मध्ये आयोजित केली होती.

क.पाचवी जागतिक सायबर स्पेस परिषद दिल्ली येथे 2017 मध्ये आयोजित केली गेली.

(1)

(2)

(3)

(4)वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :

प्र.८१. अयोग्य विधान निवडा.

अ.प्रत्येक वर्षी 10th ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो.

ब.जागतिक मानसिक आरोग्य दिन 2017 ची संकल्पना 'कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य' ही होती.

क.प्रत्येक वर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.

ड.2017 सालच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना 'नैराश्य' अशी होती.

(1)

(2)

(3)

(4)वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :

प्र.८३. भारतीय शासनाने 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2017 हा 21 दिवसांचा कालखंड ________ म्हणून साजरा केला ?

(1) पर्यटन पर्व

(2) स्वच्छता पंधरवडा

(3) राष्ट्रीय एकात्मता पर्व

(4) मानसिक आरोग्य जागृति अभियान

उत्तर :

प्र.८४. भारत शासनाचा 'भारत नेट' हा महत्वपूर्ण कार्यक्रम ________ शी संबंधित आहे ?

(1) भारतातील ग्रामीण आणि सुदूर भागांमध्ये ब्रॉडबँड सेवा पुरवणे

(2) भारतातील सर्व उच्च शैक्षणिक संस्थाना ब्रॉडबँड सेवा पुरवणे

(3) भारतातील सर्व रेल्वे स्टेशनांवर ब्रॉडबँड सेवा पुरवणे

(4) भारतातील सर्व सरकारी रुग्णालयांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे

उत्तर :

प्र.८५. महाराष्ट्र शासनाची सुमतिबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना कशाशी संबंधित आहे ?

(1) (अनुदान प्राप्त झालेल्या) पात्र महिला स्वयांसहाय्यता समुहांना व्याज अनुदान देण्याबाबत

(2) महिला उद्योजिकांना जमिन खरेदीसाठी कर्ज पुरवठा

(3) मुंबई आणि नागपूर मधील महिला उद्योजिकांना कर माफी

(4) महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता समुहांना 4 % दराने कर्जपुरवठा करणे

उत्तर :

प्र.८६. पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली ?

(1) दुसरा चंद्रगुप्त

(2) समुद्रगुप्त

(3) कुमारगुप्त

(4) स्कंदगुप्त

उत्तर :

प्र.८७. जोड्या लावा :

अ.तक्षणI.सुतार

ब.भागदुगII.कर वसुल करणारा

क.क्षत्तरीIII.राजाचा खासगी कारभारी

ड.विधाताIV.पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असे कायदेमंडळ

पर्यायी उत्तरे :



(1)IVIIIIII

(2)IIIIVIII

(3)IIIIIIIV

(4)IIIIVIII

उत्तर :

प्र.८८. खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा :

विधान 'अ' : महाराष्ट्रातील जोर्वे, नेवासा, दायमाबाद, चांडोली, सोनगांव, इनामगांव, प्रकाशे, नाशिक, इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.

विधान 'ब' : राजस्थानमध्ये आहार व गिलुंड, मध्यप्रदेशातील माळवा, कायथा, एरण, इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.

(1) दोन्ही विधाने बरोबर आहेत

(2) दोन्ही विधाने चूक आहेत

(3) विधान 'अ' बरोबर आहे, परंतू विधान 'ब' चूकीचे आहे

(4) विधान 'ब' बरोबर आहे, परंतू विधान 'अ' चूकीचे आहे

उत्तर :

प्र.८९. दाशराज्ञ युद्ध पुढीलपैकी कोनात घडले होते ?

(1) पुरोहित व विश्वामित्र

(2) विश्वामित्र आणि भरत जमात

(3) सुदास व वशिष्ठ

(4) पुरु व विश्वामित्र

उत्तर :

प्र.९०. खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या 'धम्म' ची माहिती आहे ?

(1) छोटे शिलालेख

(2) भाब्रु शिलालेख

(3) कलिंग शिलालेख

(4) चौदा शिलालेख

उत्तर :

प्र.९१. चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याचे चार प्रांत व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या जुळवा :

अ.उत्तरपथI.पाटलीपुत्र

ब.पश्चिम पथII.सुवर्णगिरी

क.पुर्व पथIII.उज्जयिनी

ड.दक्षिण पथIV.तक्षशिला



(1)IIIIIIVI

(2)IIVIIIII

(3)IVIIIIII

(4)IIIIIIVI

उत्तर :

प्र.९२. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा :

अ.विशाल साम्राज्याचा संस्थापक.

ब.सुसंस्कृत, विद्वान आणि कवी.

क.प्रसिद्ध कवि हरिसेन हा त्याचा राजकवी होता व बोद्धपंडीत वसुबंधू त्याच्या दरबारात होता.

ड.'भारतीय नेपोलियन' अशी विन्सेंट स्मिथ त्याची प्रशंसा करतात.

पर्यायी उत्तरे :

(1)हरिसेन

(2)कनिष्क

(3)समुद्रगुप्त

(4)चंद्रगुप्त मौर्य

उत्तर :

प्र.९३. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा :

अ.त्याने उलेमांचे राज्यातील वर्चस्व नष्ट केले.

ब.तो पराक्रमी योद्धा व यशस्वी सेनापती होता.

क.दक्षिणेकडील राज्यांवर स्वारी करणारा पहिला सुलतान असावा.

ड.त्याच्या दरबारात अमीर खुसरो हा नामवंत कवी होता.

पर्यायी उत्तरे :

(1)अल्तमश

(2)महमंद तुघलक

(3)अल्लाउद्दिन खिलजी

(4)कुतुबुद्दीन ऐबक

उत्तर :

प्र.९४. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा :

अ.या राजास 'आंध्रभोज' ही पदवी देण्यात आलेली होती.

ब.त्याच्या दरबारात आठ प्रसिद्ध तेलुगु कवी होते.

क.'नागलपूरम' नावाचे नगर त्याने स्थापन केले होते.

ड.बिदर, गुलबर्गा ह्या मुसलमान राज्याच्या राजधान्या जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता.

(1)रामदेव राय

(2)पुलकेशी प्रथम

(3)पहिला परान्तक

(4)कृष्णदेवराय

उत्तर :

प्र.९५. टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टन तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ?

(1) टिपूने युद्ध खर्च म्हणून साडेतीन कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत.

(2) टिपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे.

(3) टिपूची दोन मुले इंग्रजांकडे ओलीस राहतील.

(4) टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा.

उत्तर :

प्र.९६. __________ यांनी रोम आणि पॅॅॅॅरिस मध्येही 'फ्री इंडिया सेंटर्स' सुरु केली होती ?

(1) सुभाष चन्द्र बोस

(2) मॅॅडम कामा

(3) अॅॅॅॅनी बेझंट

(4) शामजी कृष्णवर्मा

उत्तर :

प्र.९७. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ?

अ.ती गांधीजींची कट्टर अनुयायी होती.

ब.ती ब्रिटीश आरमार प्रमुखाची मुलगी होती.

क.ती मीरा बेन या लोकप्रिय नावाने ओळखली जात असे.

(1)सिस्टर निवेदिता

(2)मिस कार्पेंटर

(3)मिस स्लाद

(4)मिस नाइटिंगेल

उत्तर :

प्र.९८. खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा :

अ.भारतातील विविध नविन घडामोडी परंपरागत आणि मनाने प्रजा असलेल्या समाजास बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्वीकारून चळवळ करण्याची हाक देत होता.

ब.हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होते.

(1) दोन्ही विधाने बरोबर व विधान ब विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे

(2) दोन्ही विधाने चुकीची आहेत

(3) दोन्ही विधाने बरोबर परंतु विधान ब विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही

(4) विधान अ बरोबर पण विधान ब चूक

उत्तर :

प्र.९९. पुढील वाक्यांत वर्णन केलेले समाजसुधारक कोण ते ओळखा :

अ.त्यांच्या कुटूंंबाचा जाती व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीराच्या शिकवणूकीवर विश्वास होता.

ब.त्यांचे वडील सैन्यात होते आणि ते सुभेदार-मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

क.त्यांच्या शाळेतील शिपाई बाईंंना त्यांचे दफ्तरही अस्पृश्य वाटे.

ड.ते अस्पृश्य असल्यामुळे संंस्कृत शिकू शकले नाहीत.

(1)महात्मा ज्योतिबा फुले

(2)श्री जवळकर

(3)डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(4)श्री घोलप

उत्तर :

प्र.१००. पुढील वाक्यात कोणत्या समाजसुधारकाचे वर्णन केले आहे ?

अ.त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती.

ब.अनेक धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते दोन वर्षांकरिता इंग्लडला गेले होते.

क.अॅॅमस्टरडॅम येथील धर्मपरिषदेला ते उपस्थित होते.

ड.सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन करीत.

(1)डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(2)विठ्ठल रामजी शिंदे

(3)भाऊराव पाटील

(4)बाबुराव जेधे

उत्तर :