Total Questions : 100Total Marks : 100
प्र.१. 1857 च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली ?
(1) सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया
(2) लेफ्टनंट गव्हर्नर
(3) चीफ कमिशनर
(4) परराष्ट्र मंत्री
उत्तर :
प्र.२. जोड्या जुळवा :
अ.दीनबंधू मित्रI.बार्डोली सत्याग्रह
ब.बाबा रामचंद्रII.मुळशी सत्याग्रह
क.सरदार वल्लभभाई पटेलIII.अयोध्येच्या शेतकऱ्यांचा लढा
ड.सेनापती बापटIV.'नीलदर्पण' नाटक
पर्यायी उत्तरे :
अबकड
(1)IIIIVIII
(2)IIIIVIII
(3)IVIIIIII
(4)IIIIIVII
उत्तर :
प्र.३. 'इंडियन असोसिएशन' या संस्थेविषयी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ.संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतला होता.
ब.हिंदू आणि मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता.
क.फिरोजशाह मेहता व के.टी.तेलंग यांनी संस्था चालविली.
ड.सिव्हील सर्व्हिस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न केले.
पर्यायी उत्तरे :
(1)अ आणि ब विधाने बरोबर आहेत.
(2)अ, ब आणि क विधाने बरोबर आहेत.
(3)ब आणि क विधाने बरोबर आहेत.
(4)ब आणि ड विधाने बरोबर आहेत.
उत्तर :
प्र.४. कॉंग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटीश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
(1) मुंबई (1889)
(2) अलाहाबाद (1888)
(3) मद्रास (1887)
(4) कलकत्ता (1886)
उत्तर :
प्र.५. सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये कोणती आहेत ?
अ.खान अब्दूल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग.
ब.महात्मा गांधीजींनी 'कैसर-इ-हिंद' पदवी सरकारला परत केली.
क.धारासणा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केले.
ड.स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी.
पर्यायी उत्तरे :
(1)अ आणि क विधाने बरोबर आहेत.
(2)ब, क आणि ड विधाने बरोबर आहेत.
(3)अ, क आणि ड विधाने बरोबर आहेत.
(4)ब आणि ड विधाने बरोबर आहेत.
उत्तर :
प्र.६. मराठवाड्यातील पाथ्री गावचे देवीदास कांबळे हे _________ चे पुढारी होते ?
(1) महार समाज
(2) मातंग समाज
(3) माथाडी समाज
(4) माळकरी समाज
उत्तर :
प्र.७. खाकसार म्हणजे _________ होय.
(1) मुसलमानांची लढाऊ संघटना
(2) हिंदूंची लढाऊ संघटना
(3) शिखांची लढाऊ संघटना
(4) गुरख्यांची लढाऊ संघटना
उत्तर :
प्र.८. विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तींपैकी कोण होते ?
(1) मदनलाल बागडी, विनायक स. दांडेकर आणि श्यामनारायण काश्मिरी
(2) सुखदेव आणि श्यामनारायण काश्मिरी
(3) राजगुरू, सुखदेव आणि श्यामनारायण काश्मिरी
(4) राजगुरु आणि विनायक स. दांडेकर
उत्तर :
प्र.९. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे _______ येथील होमरुलचे सक्रिय कार्यकर्ते होते.
(1) मराठवाडा
(2) कोकण
(3) विदर्भ
(4) खानदेश
उत्तर :
प्र.१०. डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही 1857 च्या उठावाची _______ कारणे होती.
(1) सामाजिक
(2) राजकीय
(3) आर्थिक
(4) लष्करी
उत्तर :
प्र.११. सन 1925 मध्ये खाडिलकरांनी 'नवाकाळ' हे वृतपत्र सुरु केले. त्यामध्ये राजकारणा व्यतिरिक्त खालील इतर कोणते विषय होते ?
अ.व्यापार
ब.शिक्षण
क.बाजारभाव
ड.चित्रपट
पर्यायी उत्तरे :
(1)अ आणि ब
(2)ब आणि क
(3)क आणि ड
(4)अ आणि क
उत्तर :
प्र.१२. गांधीजींच्या 'वर्धा शिक्षण योजनेत' पुढीलपैकी कोणत्या लघु उद्योगाचा समावेश नव्हता ?
अ.शेती
ब.चांभारकाम
क.कुंभारकाम
ड.लाकूडकाम
पर्यायी उत्तरे :
(1)अ, ब आणि क
(2)ब, क आणि ड
(3)अ, क आणि ड
(4)फक्त अ आणि ब
उत्तर :
प्र.१३. जोड्या जुळवा :
अ.रास्त गोफ्तारI.तात्या छत्रे
ब.ज्ञान सिंधूII.कृष्णाजी त्र्यंबक रानडे
क.ज्ञान प्रकाशIII.विश्वनाथ नारायण मंंडलीक
ड.नेटिव्ह ओपिनियनIV.दादाभाई नौरोजी
पर्यायी उत्तरे :
अबकड
(1)IIIVIIII
(2)IVIIIIII
(3)IIIIIIIV
(4)IIIIIVII
उत्तर :
प्र.१४. पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ?
(1) कृष्णराव भालेकर
(2) दिनकरराव जवळकर
(3) तात्यासाहेब करंदीकर
(4) श्रीपतराव शिंदे
उत्तर :
प्र.१५. 'राष्ट्रीय मिल मजदूर संघाची' मुंबई मध्ये स्थापना कोणी केली ?
(1) जी.डी.आंबेडकर
(2) एस.एम.जोशी
(3) एन.एम.जोशी
(4) दत्ता सामंत
उत्तर :
प्र.१६. खालीलपैकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे ?
(1) भूमीखंडाचा विस्तृत भाग
(2) भारताच्या तिन्ही बाजूनी असणारा समुद्र
(3) 30॰ ते 40॰ अक्षांसाच्या पट्ट्यात जेट वायुचे अस्तित्व
(4) वरील सर्व
उत्तर :
प्र.१७. सिमेंट उद्योग केंद्राचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा योग्य क्रम लावा :
(1) चित्तौडगढ, सवाई माधोपूर, खेतडी, दालमिया दाद्री
(2) दालमिया दाद्री, सवाई माधोपूर, चित्तौडगढ, खेतडी
(3) सवाई माधोपूर, चित्तौडगढ, खेतडी, दालमिया दाद्री
(4) दालमिया दाद्री, खेतडी, सवाई माधोपूर, चित्तौडगढ
उत्तर :
प्र.१८. नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे ?
(1) बिहार
(2) गुजरात
(3) आसाम
(4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर :
प्र.१९. काथ ____________ झाडापासून मिळवतात.
(1) खैर
(2) सुंद्री
(3) साग
(4) आकासीया / आकेशिया
उत्तर :
प्र.२०. __________ राज्य पवनउर्जेत अग्रेसर आहे.
(1) महाराष्ट्र
(2) केरळ
(3) कर्नाटक
(4) तामिळनाडू
उत्तर :
प्र.२१. __________ उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे.
(1) भुवनेश्वर
(2) हाजीपूर
(3) गुवाहाटी
(4) गोरखपूर
उत्तर :
प्र.२२. खालील विधानांची सत्यता तपासा :
विधान 'अ' : महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग बेसाॅॅल्ट खडकाने व्यापलेला आहे.
विधान 'ब' : महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हारसाच्या संचयाने झालेली आहे.
(1) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
(2) विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
(3) विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
(4) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
उत्तर :
प्र.२३. खालील विधानांची सत्यता तपासा :
विधान 'अ' : कोकणचे हवामान हे थंड, विषम आणि कोरडे आहे.
विधान 'ब' : महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण, सम आणि दमट आहे.
(1) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
(2) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
(3) विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
(4) विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
उत्तर :
प्र.२४. खालील विधानांची सत्यता तपासा :
विधान 'अ' : समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होत जाते. याला तापमानाचा सामान्य लोपदर असे म्हणतात.
विधान 'ब' : समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होण्या ऐवजी वाढत जाते. याला तापमानाची विपरीतता म्हणतात.
(1) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
(2) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
(3) विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
(4) विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
उत्तर :
प्र.२५. खालील विधानांची सत्यता तपासा :
विधान 'अ' : एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचे प्रमाण भरपूर असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण कमी असेल तर अशा लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या म्हणतात.
विधान 'ब' : एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचे प्रमाण कमी असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल तर अशा लोकसंख्येला न्यूनतम लोकसंख्या म्हणतात.
(1) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
(2) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
(3) विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
(4) विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
उत्तर :
प्र.२६. खालील विधानांची सत्यता तपासा :
विधान 'अ' : हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या तुलनेने उत्तर भारतामध्ये तापमान खूपच कमी असते. त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते.
विधान 'ब' : हिवाळ्यामध्ये उत्तर भारताच्या तुलनेने द्वीपकल्पीय भारतामध्ये तापमान खूपच जास्त असते. त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण कमी असते.
(1) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
(2) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
(3) विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
(4) विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
उत्तर :
प्र.२७. भारताचे अंटार्क्टिका वर __________ हे संशोधन केंद्र आहे.
(1) आर्यभट्ट
(2) रोहिणी
(3) इंदिरा पॉईंट
(4) मैत्री
उत्तर :
प्र.२८. रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याशी क्षमता जास्त असल्याने ही जमीन __________या पिकासाठी उत्कृष्ट आहे.
(1) रबर
(2) कॉफी
(3) ताग
(4) कापूस
उत्तर :
प्र.२९. योग्य जोड्या जुळवा :
स्तंभ अस्तंभ ब
(मुख्य नद्या)(उपनद्या)
अ.तापीI.पंचगंगा
ब.गोदावरीII.इंद्रायणी
क.भीमाIII.पांझरा
ड.कृष्णाIV.प्रवरा
पर्यायी उत्तरे :
अबकड
(1)IIIIVIII
(2)IIIIIIIV
(3)IVIIIIII
(4)IIIIIIIV
उत्तर :
प्र.३०. द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील __________ परिसरात दाट लोकवस्ती आढळते.
(1) लातूर - उस्मानाबाद
(2) जळगाव - भुसावळ
(3) पंढरपूर - सोलापूर
(4) पिंपरी - चिंचवड
उत्तर :
प्र.३१. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही ?
अ.उत्पादन पद्धती
ब.आर्यात-निर्यात पद्धती
क.उत्पन्न पद्धती
ड.खर्च पद्धती
पर्यायी उत्तरे :
(1)अ आणि ब
(2)क आणि ड
(3)फक्त ब
(4)फक्त ड
उत्तर :
प्र.३२. केंद्र्शासनाचे अंदाजपत्रक महसूली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे दोन भागात विभागले जाते. केंद्रशासनाच्या महसूली प्राप्तीचे खालीलपैकी कोणते दोन स्त्रोत/मार्ग आहेत ?
अ.बाह्य कर्ज
ब.कर महसूल
क.अल्प बचती
ड.करेत्तर महसूल
पर्यायी उत्तरे :
(1)अ आणि ब
(2)ब आणि ड
(3)क आणि ड
(4)अ आणि क
उत्तर :
प्र.३३. भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती ?
(1) एस.व्ही.एस.राघवन प्रतिमान
(2) चक्रवर्ती प्रतिमान
(3) केळकर प्रतिमान
(4) महालनोबिस प्रतिमान
उत्तर :
प्र.34. खालील विधाने विचारात घ्या :
अ.मौद्रिक धोरणाच्या अमंलबजावणी साठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मुख्य संस्था आहे.
ब.आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरण उद्दिष्ट आहे.
क.बँक दर हे मौद्रिक धोरणाचे साधन आहे.
पर्यायी उत्तरे :
(1) अ आणि ब
(2) ब आणि क
(3) अ आणि क
(4) वरील सर्व
उत्तर :
प्र.३५. खालील विधाने विचारात घ्या :
अ.शिल्लकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते.
ब.तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दुर करण्यासाठी उपयुक्त आहे.
क.भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
(1) अ आणि ब
(2) ब आणि क
(3) फक्त ब
(4) फक्त क
उत्तर :
प्र.३६. योग्य जोड्या जुळवा :
अ.प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरणI.1976 चा कायदा
ब.प्रादेशिक ग्रामीण बँकेची (RRBs) स्थापनाII.1998
क.इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेत रुपांतरIII.जुलै, 1969
ड.नरसिंहम समितीचा दुसरा अहवालIV.जुलै, 1955
पर्यायी उत्तरे :
अबकड
(1)IIIIIIIV
(2)IIIIIVII
(3)IIIVIIII
(4)IVIIIIII
उत्तर :
प्र.३७. भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती ?
(1) नियोजन आयोग
(2) राष्ट्रीय नमुना पाहणी (NSS)
(3) गाडगीळ समिती
(4) कोठारी आयोग
उत्तर :
प्र.३८. खालीलपैकी कोणता स्वयंरोजगार कार्यक्रम 1983-84 च्या कालावधीत सुरु करण्यात आला, आणि नंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेत (PMRY) समाविष्टीत करण्यात आला ?
(1) शहरी स्वयंरोजगार कार्यक्रम (USEP)
(2) शहरी महिला स्वयंसहाय्यता कार्यक्रम (UWSP)
(3) सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयं रोजगार कार्यक्रम (SEEUY)
(4) ग्रामीण गरिबांसाठी स्वयंरोजगार
उत्तर :
प्र.३९. खालील विधाने विचारात घ्या :
अ.1976 मध्ये, सामान्य लेखा खाते नियंत्रण नावाच्या संस्थेची स्थापना झाली.
ब.सामान्य लेखा नियंत्रण संख्या ही संघीय सरकारच्या विनियोग खाते आणि वित्तीय खाते यांची संक्षिप्त रचना तयार करते.
क.सामान्य लेखा खाते नियंत्रण संस्थेचे विनियोग लेखा परीक्षण आणि नियामक लेखा परीक्षण करण्याचे वैधानिक कर्तव्य आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
(1) अ आणि ब
(2) फक्त अ
(3) ब आणि क
(4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :
प्र.४०. खालीलपैकी कोणते राजकोषिय धोरणाचे साधन/साधने आहे/आहेत ?
अ.विदेशी गुंतवणूक
ब.कर
क.सार्वजनिक खर्च
क.बँक दर धोरण (BRP)
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ
(2) ब आणि क
(3) अ आणि ड
(4) फक्त ड
उत्तर :
प्र.४१. खालील विधाने विचारात घ्या :
अ.ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागामध्ये स्वयम् रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे.
ब.स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेचे उद्दिष्टे शहरी भागामध्ये स्वयम् रोजगार आणि वेतन रोजगार या दोन्ही मध्ये रोजगार संधी निर्माण करणे आहे.
क.ऑगस्ट 2011 मध्ये संसदेत पास केलेला नवीन कायदा महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कायदा म्हणून ओळखला जातो.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
पर्यायी उत्तरे :
(1) अ आणि क
(2) ब आणि क
(3) अ आणि ब
(4) वरील सर्व
उत्तर :
प्र.४२. लोकसंख्या संक्रमण सिद्धांता अनुसार खालील विधाने विचारात घ्या :
अ.पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन आणि मागासलेली असते.
ब.दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्येची वृद्धी जलद होते.
क.तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण आणि औद्योगीकरण जलद होते.
ड.1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
पर्यायी उत्तरे :
(1) अ आणि ब
(2) ब आणि क
(3) क आणि ड
(4) वरील सर्व
उत्तर :
प्र.४३. खालीलपैकी कोणते वाक्य/वाक्ये योग्य आहे/आहेत ?
अ.लेखापरिक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार (Transaction) तपासू शकत नाही.
ब.लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम / निर्णायक स्वरूपाचा नसतो.
क.लेखापरिक्षक तज्ञावर विश्वास ठेवून असतो.
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ
(2) ब आणि क
(3) फक्त क
(4) अ, ब आणि क
उत्तर :
प्र.४४. खालील विधाने विचारात घ्या :
अ.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल, 1935 रोजी झाली.
ब.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण 1950 मध्ये झाले.
क.भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून एक रुपयेची नोट आणि सर्व परिमाण नाणी जारी केली जातात.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
(1) अ आणि ब
(2) ब आणि क
(3) फक्त क
(4) फक्त ब
उत्तर :
प्र.४५. खालील विधाने विचारात घ्या :
अ.विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी स्थापना केली.
ब.वित्त मंत्री श्री नरसिंहराव यांनी 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण जाहीर केले.
क.सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
पर्यायी उत्तरे :
(1) अ आणि ब
(2) ब आणि क
(3) अ आणि क
(4) वरील सर्व
उत्तर :
प्र.४६. जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले, तर त्यांच्या परिणामी रोध 45 Ω होतो आणि जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांच्या परिणामी रोध 10 Ω होतो, तर त्या रोधाच्या किंमती किती ?
(1) 10 Ω, 45 Ω
(2) 10 Ω, 30 Ω
(3) 15 Ω, 30 Ω
(4) 10 Ω, 45Ω
उत्तर :
प्र.४७. पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण 'प्रिझम' मधून गेले असता, त्याच्यात समाविष्ट असणाऱ्या रंगाच्या किरणांमध्ये किंवा तरंगलांबी मध्ये वेग-वेगळे (seperated) होतात. या दृक चमत्काराला __________ म्हणतात.
(1) प्रकाशाचे परावर्तन
(2) प्रकाशाचे अपवर्तन
(3) प्रकाशाचे अपस्करण
(4) प्रकाशाचे विवर्तन
उत्तर :
प्र.४८. जर 0.2 A इतकी विद्युतधारा 100 Ω रोध असलेल्या तारेच्या विद्युतइस्त्री मधून एका मिनीटासाठी प्रवाहित केली, तर किती ज्यूल उष्मा निर्माण होईल ?
(1) 24 Joules
(2) 240 Joules
(3) 2400 Joules
(4) 24000 Joules
उत्तर :
प्र.४९. प्रदीर्घ आवर्त सारणीत __________ ह्या दोन मुलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो.
(1) B आणि Si
(2) Li आणि Mg
(3) Be आणि Al
(4) वरीलपैकी सर्व
उत्तर :
प्र.५०. एका 257 g वजनाच्या चेंडूचा वेग 257 m/s असेल तर त्याची तरंगलांबी _______ m इतकी असते.
दिले गेले आहे : h=6.626x10-34 J/s
(1) 10-35
(2) 10-32
(3) 10-38
(4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर :
प्र.५१. इथिलिनच्या रेणू मध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात ?
(1) 3
(2) 5
(3) 2
(4) 1
उत्तर :
प्र.५२. खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रीय पातळीचे संघटन आढळले ?
(1) पॉरीफेरा
(2) आदिजीव (प्रोटोझोआ)
(3) चपटकृमी (प्लॅॅटीहेलमिंथिस)
(4) सिलेंटराटा
उत्तर :
प्र.५३. झुरळांच्या उदरामध्ये टरगा (T) आणि स्टरना (S) यांचा खरा क्रम हा आहे.
(1) T - 10, S - 10
(2) T - 9, S - 9
(3) T - 9, S - 10
(4) T - 10, S - 9
उत्तर :
प्र.५४. मॅॅलीयस्, इनकस् आणि स्टॅॅप्स् यांना असे सुध्दा म्हणतात.
(1) इयर ऑस्सिकल
(2) ऑडिटरी वेसिकल
(3) बोनी इयर
(4) ऑडिटरी बोन्स्
उत्तर :
प्र.५५. पिवळ्या-हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना __________ असे संबोधतात.
(1) क्लोरोफायसी
(2) सायनोफायसी
(3) फियोफायसी
(4) झॅॅन्थोफायसी
उत्तर :
प्र.५६. म्युकोरेल्स या कवकवर्णीय वनस्पतींना _________ असे म्हणुन ओळखतात.
(1) ब्लॅॅक मोल्डस
(2) ब्लू मोल्डस
(3) ग्रीन मोल्डस
(4) यलो मोल्डस
उत्तर :
प्र.५७. बंचीटॉप हा रोग विशेषतः कोणत्या पीकांमध्ये आढळतो ?
(1) पपई
(2) लिंबु
(3) ऊस
(4) केळी
उत्तर :
प्र.५८. यु.आय.पी. भारतामध्ये 1985 सालापासून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राबविण्यास सुरुवात केली आहे. यु.आय.पी. खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे संक्षिप्त रुप आहे ?
(1) युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम
(2) युनिक आयडेंटिफिकेशन प्रोग्राम
(3) युनायटेड इंडियन पाॅॅलिसी
(4) वरीलपैकी कोणताही पर्याय नाही
उत्तर :
प्र.५९. 12 ड ही प्रकिया अन्नावर केल्यास ____________
(1) उष्णतेची प्रक्रिया जी 12 जिवाणू मारते.
(2) प्रक्रिया करून अन्न साठविण्याच्या 12 (बारा) विविध पद्धती
(3) क्लाॅॅस्ट्रिडियम बाॅॅट्यूलिनम (Clostridium botulinum) चा अंतर्गोलाच्या संख्येत 1012 पटीने कपात होते.
(4) कोणतीही प्रक्रिया जी अधिक तापमानाला जिवंत राहणाऱ्या जंतूचा नाश करते.
उत्तर :
प्र.६०. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रीनोजेनचे फायब्रिनमध्ये रुपांतर होते
(1) हा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आहे व यात अनेक घटकांचा सहभाग आहे
(2) फायब्रीनोजेन (Fibrinogen) फुटलेल्या रक्तबिंबिकेतून बाहेर टाकले जाते
(3) ह्याचा संबंध उच्च रक्तदाबाशी असल्याने रोहिणीच्या भिंत्तीना इजा पोहोचू शकते
(4) हिमोफिलीया हा आजार असलेल्या व्यक्तींमध्ये हा त्रास होऊ शकतो
उत्तर :
पुढील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करुन प्रश्नांचे उत्तर द्या.
N, U, E, G, I, S आणि X हे सात विद्यार्थी वेगवेगळ्या तीन कॉलेजमध्ये शिकत आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये किमान दोघे शिकत आहेत. इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांपैकी प्रत्येकाचा एक विषय आवडता आहे. आवडता विषय याच क्रमाने असण्याची गरज नाही.
E याचा आवडता विषय भौतिकशास्त्र आहे आणि तो फक्त N बरोबर नंबर दोन कॉलेज मध्ये शिकतो. I हा नंबर दोन कॉलेजमध्ये शिकत नाही आणि त्याला इंग्रजी आवडतो. G हा नंबर तीन कॉलेजमध्ये शिकतो आणि त्याला गणित आवडत नाही. ज्यांना भूगोल व रसायनशास्त्र आवडतात, ते एकाच कॉलेजमध्ये शिकतात. X ला जीवशास्त्र आवडते आणि तो नंबर एक कॉलेजमध्ये शिकत नाही. S हा I बरोबर शिकत नाही. S ला रसायनशास्त्र आवडत नाही. N ला इतिहास आवडत नाही.
प्र.६१. S कोणत्या कॉलेजमध्ये शिकतो ?
(1) नंबर एक
(2) नंबर दोन
(3) नंबर तीन
(4) निश्चित सांगता येत नाही
उत्तर :
प्र.६२. एका सांकेतिक भाषेत LANGUAGE हा शब्द NDPJWDIH असा लिहतात. तर OFFICIAL हा शब्द याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल ?
(1) QIILELCM
(2) QIHLELCO
(3) QIILEJCM
(4) QIHLEKCO
उत्तर :
प्र.६३. जर तिन्ही आकृत्यांत एकाच नियमांचे पालन केले असेल तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.
(1) 11
(2) 14
(3) 10
(4) 7
उत्तर :
प्र.६४. पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल ?
26, 50, 82, ?
(1) 122
(2) 170
(3) 145
(4) 101
उत्तर :
प्र.६५. दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
11, 5, 20, 12, 38, ?, 74, 54
(1) 42
(2) 32
(3) 26
(4) 22
उत्तर :
प्र.६६. A, B, C, D आणि E हे उत्तरेकडे तोंड करून मैदानात उभे आहेत. त्यांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे :
अ.D च्या उजव्या बाजूस 40 मी. वर B आहे.
ब.B च्या दक्षिणेस 60 मी. वर A आहे.
क.D च्या पश्चिमेस 25 मी. वर C आहे.
ड.A च्या उत्तरेस 90 मी. वर E आहे.
तर B च्या डाव्या बाजूस जो आहे, त्याच्या ईशान्य दिशेला कोण आहे ?
(1) A
(2) C
(3) D
(4) E
उत्तर :
प्र.६७. जर PEN = 70, BOOK = 86 असेल तर DUSTER = किती ?
(1) 174
(2) 184
(3) 186
(4) 188
उत्तर :
प्र.६८. एक व्यक्ती रेल्वेपूलावर उभी असून त्या पूलाची लांबी 180 मी. आहे. एक आगगाडी त्या व्यक्तीस 8 सेकंदात व पूलास 20 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी व वेग शोधा.
(1) 115 मी. आणि 15 मी./से.
(2) 120 मी. आणि 10 मी./से.
(3) 110 मी. आणि 15 मी./से.
(4) 120 मी. आणि 15 मी./से.
उत्तर :
प्र.६९. खालील चौकोनाकृती ठोकळ्याच्या अवस्थांचे निरीक्षण करा आणि 1 विरुद्ध बाजूचा अंक शोधा.
(1) 2
(2) 4
(3) 5
(4) 3
उत्तर :
प्र.७०. 1600 चे 60 टक्के हे क्ष च्या 80 टक्क्यांइतके आहेत. तर क्ष ची किंमत किती ?
(1) 1000
(2) 1200
(3) 1400
(4) 1600
उत्तर :
प्र.७१. एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. टाकीच्या तळाला गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल, तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल ?
(1) 24 तास
(2) 16 तास
(3) 12 तास
(4) 10 तास
उत्तर :
प्र.७२. दोन जहाजे A व B हे एकमेकांपासून 155 सागरी मैल अंतर असलेल्या दोन बेटांवरून प्रवास सुरु करतात. जहाज A हे B च्या पश्चिमेला असून ते पूर्वेकडे प्रति तास 25 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरु करते. त्याचवेळेस जहाज B हे दक्षिणेकडे प्रति तास 20 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरु करते. ३ तासांच्या प्रवासानंतर त्या जहाजांमधील अंतर किती ?
(1) 120 सागरी मैल
(2) 100 सागरी मैल
(3) 90 सागरी मैल
(4) 80 सागरी मैल
उत्तर :
प्र.७३. २० मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास करून किती दिवसात पूर्ण करतील ?
(1) 12 दिवस
(2) 15 दिवस
(3) 20 दिवस
(4) 18 दिवस
उत्तर :
प्र.७४. x आणि y व्यस्त चलनात आहेत.
जेव्हा x = 3 तेव्हा y = 4 असतात.
जर x = 9 असेल तर y ची किंमत किती ?
(1) 3/4
(2) 3/7
(3) 5/3
(4) 4/3
उत्तर :
प्र.७५. काजूची किंमत प्रतिकिलो ₹ 1,000 तर पिस्त्याची किंमत प्रतिकिलो ₹ 1,200 आहे. जर काजू व पिस्त्याचे मिश्रण प्रतिकिलो ₹ 1,050 विकले, तर त्या मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण किती ?
(1) 1:3
(2) 2:1
(3) 3:1
(4) 3:2
उत्तर :
प्र.७६. नुकतीच भारतीय नौदलात समाविष्ट पाणबुडी आई.एन.एस. कलवरी कोणत्या देशाच्या सहकार्याने निर्माण केली गेली ?
(1) अमेरिकेची संयुक्त संस्थाने
(2) जपान
(3) फ्रान्स
(4) इस्त्रायल
उत्तर :
प्र.७७. या वर्षीचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पाचवा "बैलन डी'ओर" पुरस्कार मिळविणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या पुढीलपैकी कोणत्या क्लबकडून खेळतो ?
(1) एफ.सी.बार्सिलोना
(2) जुवेंटस
(3) रीअल माद्रीद
(4) ए.सी.मिलान
उत्तर :
प्र.७८. अलिकडेच फेब्रुवारी 2018 फायनान्शियल टेक्नोलॉजी (फिनटेक) धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
(1) महाराष्ट्र
(2) आंध्र प्रदेश
(3) कर्नाटक
(4) गुजरात
उत्तर :
प्र.७९. भारतातील कोणत्या शहरात ग्लोबल एंटरप्रिन्योरशिप समिट, 2017 आयोजित करण्यात आले ?
(1) मुंबई
(2) हैदराबाद
(3) नवी दिल्ली
(4) वाराणसी
उत्तर :
प्र.८०. कोणत्या देशाच्या संघास हरवून फ्रान्सने दहावा डेव्हीस कप जिंकला ?
(1) जर्मनी
(2) इटली
(3) सं.रा.अमेरिका
(4) बेल्जियम
उत्तर :
प्र.८१. खालीलपैकी कोणत्या आय.ए.एस. अधिकाऱ्याची भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) च्या महासंचालकपदी नुकतीच (जाने. 2018) नियुक्ती करण्यात आली ?
(1) पोमा तुडु
(2) सुरेंद्र कुमार सोलंकी
(3) दीपक कपूर
(4) नीलम कपूर
उत्तर :
प्र.८२. 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मध्ये कोणत्या चित्रपटास 'स्वर्ण मयूर' पुरस्कार प्राप्त झाला ?
(1) एंजेल्स वियर व्हाईट
(2) टेक ऑफ
(3) क्षितिज
(4) 120 बीट्स पर मिनिट
उत्तर :
प्र.८३. 2017 सालच्या IFFI तर्फे दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी कोण ?
(1) अॅॅटम इगोयान
(2) व्हिवियन क्यू
(3) अमिताभ बच्चन
(4) किरो रुसो
उत्तर :
प्र.८४. 'तपी' प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
(1) जलविद्युत प्रकल्प
(2) पेट्रोलियम पुरवठा
(3) पाइपद्वारे नैसर्गिक वायुपुरवठा प्रकल्प
(4) अणुऊर्जा प्रकल्प
उत्तर :
प्र.८५. 'सौभाग्य' योजना कशाशी संबंधित आहे ?
(1) प्रत्येक घरात वीज
(2) उत्कृष्ट वाहतुक
(3) अधिक चांगले रस्ते
(4) बँक क्षेत्रातील सुधारणा
उत्तर :
प्र.८६. पुढील विधानांचा विचार करुन योग्य पर्याय निवडा :
अ.माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे या वर्षासाठी इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास या पुरस्काराचे मानकरी आहेत.
ब.त्यांना हा पुरस्कार "जागतिक स्तरावर भारताचे स्थान सुधारण्यासाठी" आणि भारताच्या 'आर्थिक, सामाजिक विकासासाठी योगदान देण्यासाठी" मिळाला आहे.
क.सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली.
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ
(2) फक्त ब
(3) अ आणि ब दोन्हीही
(4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :
प्र.८७. स्पेसएक्सच्या खाजगी मंगळयान मोहिमेसाठी खालीलपैकी कोणता प्रक्षेपक पाठविण्यात आला आहे ?
(1) टेस्ला
(2) स्पेसएक्सेल
(3) फाल्कन हेवी
(4) मार्स-वन
उत्तर :
प्र.८८. बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांदरम्यान धावते ?
(1) भारत - नेपाळ
(2) भारत - पाकिस्तान
(3) भारत - बांग्लादेश
(4) भारत - भूतान
उत्तर :
प्र.८९. सरकारी योजनांचे सामाजिक लेखापरीक्षण हा शासनाच्या कामकाजाच्या भाग करणारा कायदा प्रथम अमलात आणणारे राज्य कोणते ?
(1) गोवा
(2) मेघालय
(3) कर्नाटक
(4) महाराष्ट्र
उत्तर :
प्र.९०. येशी धोंडेन यांना भारत सरकारने नुकतेच पद्मश्री देवून गौरविले. _________ क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पद्मश्री देण्यात आली ?
(1) तिबेटीयन वनौषधी
(2) नवजात अर्भकांचे आजार
(3) सर्पदंशावरील उपचार
(4) दुर्गमडोंगरी भागात दवाखाना चालवणे
उत्तर :
प्र.९१. खालीलपैकी कोणत्या पाणीवाटप तंट्यामध्ये कर्नाटकाचा समावेश नाही ?
(1) वंशधारा पाणीवाटप तंटा
(2) गोदावरी पाणीवाटप तंटा
(3) महादयी पाणीवाटप तंटा
(4) कृष्णा पाणीवाटप तंटा
उत्तर :
प्र.९२. डॉ. बी.आर.आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाच्या आत्मा मानले आहे ?
(1) कलम 19
(2) कलम 21
(3) कलम 51
(4) कलम 32
उत्तर :
प्र.९३. भारताच्या संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोड्यांपैकी कोणती जोडी अयोग्य आहे, ते ठरवा.
(1)जंगले- समवर्ती सूची
(2)स्टॉक एक्सचेंज- समवर्ती सूची
(3)पोस्ट ऑफिस बचत बँक- केंद्र सूची
(4)सार्वजनिक आरोग्य- राज्य सूची
उत्तर :
प्र.९४. विजय गोखले यांची भारताच्या परराष्ट्र सचिव पदी नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(1) गोखले हे भारतीय परराष्ट्र सेवेच्या 1981 च्या तुकडीचे अधिकारी आहेत.
(2) गोखले हे चीनविषयक प्रश्नांचे तज्ञ मानले जातात.
(3) परराष्ट्र सचिवपद भूषविणारे ते दुसरे मराठी अधिकारी आहेत.
(4) गोखले हे मुळचे मुंबईकर आहेत.
उत्तर :
प्र.९५. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?
(1) बी.एन.राव
(2) एन.गोपालस्वामी अय्यंगार
(3) श्यामा प्रसाद मुखर्जी
(4) एम.आर.जयकर
उत्तर :
प्र.९६. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांच्या भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?
(1) 42 वी दुरुस्ती
(2) 44 वी दुरुस्ती
(3) 61 वी दुरुस्ती
(4) 24 वी दुरुस्ती
उत्तर :
प्र.९७. संसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार संमत केला आहे ?
(1) 44 वी घटनादुरुस्ती कायदा
(2) 52 वी घटनादुरुस्ती कायदा
(3) 42 वी घटनादुरुस्ती कायदा
(4) 61 वी घटनादुरुस्ती कायदा
उत्तर :
प्र.९८. खालील विधाने विचारात घ्या :
अ.एम.सी.सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते.
ब.महान्यायवाद्यास भारताच्या सर्व न्यायालयांत उपस्थित रहाण्याचा अधिकार आहे.
क.महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात सहभागी होतो. त्याला तेथे बोलणे व मत देण्याचा अधिकार आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चूक आहेत ?
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ
(2) अ आणि क
(3) फक्त क
(4) वरील सर्व
उत्तर :
प्र.९९. केन्द्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे ?
(1) अनुच्छेद 325
(2) अनुच्छेद 320
(3) अनुच्छेद 318
(4) अनुच्छेद 315
उत्तर :
प्र.१००. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते ?
(1) अनुच्छेद 75
(2) अनुच्छेद 74
(3) अनुच्छेद 73
(4) अनुच्छेद 76
उत्तर :
प्र.१. 1857 च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली ?
(1) सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया
(2) लेफ्टनंट गव्हर्नर
(3) चीफ कमिशनर
(4) परराष्ट्र मंत्री
उत्तर :
प्र.२. जोड्या जुळवा :
अ.दीनबंधू मित्रI.बार्डोली सत्याग्रह
ब.बाबा रामचंद्रII.मुळशी सत्याग्रह
क.सरदार वल्लभभाई पटेलIII.अयोध्येच्या शेतकऱ्यांचा लढा
ड.सेनापती बापटIV.'नीलदर्पण' नाटक
पर्यायी उत्तरे :
अबकड
(1)IIIIVIII
(2)IIIIVIII
(3)IVIIIIII
(4)IIIIIVII
उत्तर :
प्र.३. 'इंडियन असोसिएशन' या संस्थेविषयी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ.संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतला होता.
ब.हिंदू आणि मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता.
क.फिरोजशाह मेहता व के.टी.तेलंग यांनी संस्था चालविली.
ड.सिव्हील सर्व्हिस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न केले.
पर्यायी उत्तरे :
(1)अ आणि ब विधाने बरोबर आहेत.
(2)अ, ब आणि क विधाने बरोबर आहेत.
(3)ब आणि क विधाने बरोबर आहेत.
(4)ब आणि ड विधाने बरोबर आहेत.
उत्तर :
प्र.४. कॉंग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटीश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
(1) मुंबई (1889)
(2) अलाहाबाद (1888)
(3) मद्रास (1887)
(4) कलकत्ता (1886)
उत्तर :
प्र.५. सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये कोणती आहेत ?
अ.खान अब्दूल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग.
ब.महात्मा गांधीजींनी 'कैसर-इ-हिंद' पदवी सरकारला परत केली.
क.धारासणा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केले.
ड.स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी.
पर्यायी उत्तरे :
(1)अ आणि क विधाने बरोबर आहेत.
(2)ब, क आणि ड विधाने बरोबर आहेत.
(3)अ, क आणि ड विधाने बरोबर आहेत.
(4)ब आणि ड विधाने बरोबर आहेत.
उत्तर :
प्र.६. मराठवाड्यातील पाथ्री गावचे देवीदास कांबळे हे _________ चे पुढारी होते ?
(1) महार समाज
(2) मातंग समाज
(3) माथाडी समाज
(4) माळकरी समाज
उत्तर :
प्र.७. खाकसार म्हणजे _________ होय.
(1) मुसलमानांची लढाऊ संघटना
(2) हिंदूंची लढाऊ संघटना
(3) शिखांची लढाऊ संघटना
(4) गुरख्यांची लढाऊ संघटना
उत्तर :
प्र.८. विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तींपैकी कोण होते ?
(1) मदनलाल बागडी, विनायक स. दांडेकर आणि श्यामनारायण काश्मिरी
(2) सुखदेव आणि श्यामनारायण काश्मिरी
(3) राजगुरू, सुखदेव आणि श्यामनारायण काश्मिरी
(4) राजगुरु आणि विनायक स. दांडेकर
उत्तर :
प्र.९. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे _______ येथील होमरुलचे सक्रिय कार्यकर्ते होते.
(1) मराठवाडा
(2) कोकण
(3) विदर्भ
(4) खानदेश
उत्तर :
प्र.१०. डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही 1857 च्या उठावाची _______ कारणे होती.
(1) सामाजिक
(2) राजकीय
(3) आर्थिक
(4) लष्करी
उत्तर :
प्र.११. सन 1925 मध्ये खाडिलकरांनी 'नवाकाळ' हे वृतपत्र सुरु केले. त्यामध्ये राजकारणा व्यतिरिक्त खालील इतर कोणते विषय होते ?
अ.व्यापार
ब.शिक्षण
क.बाजारभाव
ड.चित्रपट
पर्यायी उत्तरे :
(1)अ आणि ब
(2)ब आणि क
(3)क आणि ड
(4)अ आणि क
उत्तर :
प्र.१२. गांधीजींच्या 'वर्धा शिक्षण योजनेत' पुढीलपैकी कोणत्या लघु उद्योगाचा समावेश नव्हता ?
अ.शेती
ब.चांभारकाम
क.कुंभारकाम
ड.लाकूडकाम
पर्यायी उत्तरे :
(1)अ, ब आणि क
(2)ब, क आणि ड
(3)अ, क आणि ड
(4)फक्त अ आणि ब
उत्तर :
प्र.१३. जोड्या जुळवा :
अ.रास्त गोफ्तारI.तात्या छत्रे
ब.ज्ञान सिंधूII.कृष्णाजी त्र्यंबक रानडे
क.ज्ञान प्रकाशIII.विश्वनाथ नारायण मंंडलीक
ड.नेटिव्ह ओपिनियनIV.दादाभाई नौरोजी
पर्यायी उत्तरे :
अबकड
(1)IIIVIIII
(2)IVIIIIII
(3)IIIIIIIV
(4)IIIIIVII
उत्तर :
प्र.१४. पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ?
(1) कृष्णराव भालेकर
(2) दिनकरराव जवळकर
(3) तात्यासाहेब करंदीकर
(4) श्रीपतराव शिंदे
उत्तर :
प्र.१५. 'राष्ट्रीय मिल मजदूर संघाची' मुंबई मध्ये स्थापना कोणी केली ?
(1) जी.डी.आंबेडकर
(2) एस.एम.जोशी
(3) एन.एम.जोशी
(4) दत्ता सामंत
उत्तर :
प्र.१६. खालीलपैकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे ?
(1) भूमीखंडाचा विस्तृत भाग
(2) भारताच्या तिन्ही बाजूनी असणारा समुद्र
(3) 30॰ ते 40॰ अक्षांसाच्या पट्ट्यात जेट वायुचे अस्तित्व
(4) वरील सर्व
उत्तर :
प्र.१७. सिमेंट उद्योग केंद्राचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा योग्य क्रम लावा :
(1) चित्तौडगढ, सवाई माधोपूर, खेतडी, दालमिया दाद्री
(2) दालमिया दाद्री, सवाई माधोपूर, चित्तौडगढ, खेतडी
(3) सवाई माधोपूर, चित्तौडगढ, खेतडी, दालमिया दाद्री
(4) दालमिया दाद्री, खेतडी, सवाई माधोपूर, चित्तौडगढ
उत्तर :
प्र.१८. नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे ?
(1) बिहार
(2) गुजरात
(3) आसाम
(4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर :
प्र.१९. काथ ____________ झाडापासून मिळवतात.
(1) खैर
(2) सुंद्री
(3) साग
(4) आकासीया / आकेशिया
उत्तर :
प्र.२०. __________ राज्य पवनउर्जेत अग्रेसर आहे.
(1) महाराष्ट्र
(2) केरळ
(3) कर्नाटक
(4) तामिळनाडू
उत्तर :
प्र.२१. __________ उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे.
(1) भुवनेश्वर
(2) हाजीपूर
(3) गुवाहाटी
(4) गोरखपूर
उत्तर :
प्र.२२. खालील विधानांची सत्यता तपासा :
विधान 'अ' : महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग बेसाॅॅल्ट खडकाने व्यापलेला आहे.
विधान 'ब' : महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हारसाच्या संचयाने झालेली आहे.
(1) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
(2) विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
(3) विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
(4) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
उत्तर :
प्र.२३. खालील विधानांची सत्यता तपासा :
विधान 'अ' : कोकणचे हवामान हे थंड, विषम आणि कोरडे आहे.
विधान 'ब' : महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण, सम आणि दमट आहे.
(1) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
(2) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
(3) विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
(4) विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
उत्तर :
प्र.२४. खालील विधानांची सत्यता तपासा :
विधान 'अ' : समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होत जाते. याला तापमानाचा सामान्य लोपदर असे म्हणतात.
विधान 'ब' : समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होण्या ऐवजी वाढत जाते. याला तापमानाची विपरीतता म्हणतात.
(1) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
(2) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
(3) विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
(4) विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
उत्तर :
प्र.२५. खालील विधानांची सत्यता तपासा :
विधान 'अ' : एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचे प्रमाण भरपूर असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण कमी असेल तर अशा लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या म्हणतात.
विधान 'ब' : एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचे प्रमाण कमी असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल तर अशा लोकसंख्येला न्यूनतम लोकसंख्या म्हणतात.
(1) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
(2) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
(3) विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
(4) विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
उत्तर :
प्र.२६. खालील विधानांची सत्यता तपासा :
विधान 'अ' : हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या तुलनेने उत्तर भारतामध्ये तापमान खूपच कमी असते. त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते.
विधान 'ब' : हिवाळ्यामध्ये उत्तर भारताच्या तुलनेने द्वीपकल्पीय भारतामध्ये तापमान खूपच जास्त असते. त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण कमी असते.
(1) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य आहेत.
(2) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही असत्य आहेत.
(3) विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
(4) विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
उत्तर :
प्र.२७. भारताचे अंटार्क्टिका वर __________ हे संशोधन केंद्र आहे.
(1) आर्यभट्ट
(2) रोहिणी
(3) इंदिरा पॉईंट
(4) मैत्री
उत्तर :
प्र.२८. रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याशी क्षमता जास्त असल्याने ही जमीन __________या पिकासाठी उत्कृष्ट आहे.
(1) रबर
(2) कॉफी
(3) ताग
(4) कापूस
उत्तर :
प्र.२९. योग्य जोड्या जुळवा :
स्तंभ अस्तंभ ब
(मुख्य नद्या)(उपनद्या)
अ.तापीI.पंचगंगा
ब.गोदावरीII.इंद्रायणी
क.भीमाIII.पांझरा
ड.कृष्णाIV.प्रवरा
पर्यायी उत्तरे :
अबकड
(1)IIIIVIII
(2)IIIIIIIV
(3)IVIIIIII
(4)IIIIIIIV
उत्तर :
प्र.३०. द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील __________ परिसरात दाट लोकवस्ती आढळते.
(1) लातूर - उस्मानाबाद
(2) जळगाव - भुसावळ
(3) पंढरपूर - सोलापूर
(4) पिंपरी - चिंचवड
उत्तर :
प्र.३१. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही ?
अ.उत्पादन पद्धती
ब.आर्यात-निर्यात पद्धती
क.उत्पन्न पद्धती
ड.खर्च पद्धती
पर्यायी उत्तरे :
(1)अ आणि ब
(2)क आणि ड
(3)फक्त ब
(4)फक्त ड
उत्तर :
प्र.३२. केंद्र्शासनाचे अंदाजपत्रक महसूली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे दोन भागात विभागले जाते. केंद्रशासनाच्या महसूली प्राप्तीचे खालीलपैकी कोणते दोन स्त्रोत/मार्ग आहेत ?
अ.बाह्य कर्ज
ब.कर महसूल
क.अल्प बचती
ड.करेत्तर महसूल
पर्यायी उत्तरे :
(1)अ आणि ब
(2)ब आणि ड
(3)क आणि ड
(4)अ आणि क
उत्तर :
प्र.३३. भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती ?
(1) एस.व्ही.एस.राघवन प्रतिमान
(2) चक्रवर्ती प्रतिमान
(3) केळकर प्रतिमान
(4) महालनोबिस प्रतिमान
उत्तर :
प्र.34. खालील विधाने विचारात घ्या :
अ.मौद्रिक धोरणाच्या अमंलबजावणी साठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मुख्य संस्था आहे.
ब.आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरण उद्दिष्ट आहे.
क.बँक दर हे मौद्रिक धोरणाचे साधन आहे.
पर्यायी उत्तरे :
(1) अ आणि ब
(2) ब आणि क
(3) अ आणि क
(4) वरील सर्व
उत्तर :
प्र.३५. खालील विधाने विचारात घ्या :
अ.शिल्लकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते.
ब.तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दुर करण्यासाठी उपयुक्त आहे.
क.भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
(1) अ आणि ब
(2) ब आणि क
(3) फक्त ब
(4) फक्त क
उत्तर :
प्र.३६. योग्य जोड्या जुळवा :
अ.प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरणI.1976 चा कायदा
ब.प्रादेशिक ग्रामीण बँकेची (RRBs) स्थापनाII.1998
क.इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेत रुपांतरIII.जुलै, 1969
ड.नरसिंहम समितीचा दुसरा अहवालIV.जुलै, 1955
पर्यायी उत्तरे :
अबकड
(1)IIIIIIIV
(2)IIIIIVII
(3)IIIVIIII
(4)IVIIIIII
उत्तर :
प्र.३७. भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती ?
(1) नियोजन आयोग
(2) राष्ट्रीय नमुना पाहणी (NSS)
(3) गाडगीळ समिती
(4) कोठारी आयोग
उत्तर :
प्र.३८. खालीलपैकी कोणता स्वयंरोजगार कार्यक्रम 1983-84 च्या कालावधीत सुरु करण्यात आला, आणि नंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेत (PMRY) समाविष्टीत करण्यात आला ?
(1) शहरी स्वयंरोजगार कार्यक्रम (USEP)
(2) शहरी महिला स्वयंसहाय्यता कार्यक्रम (UWSP)
(3) सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयं रोजगार कार्यक्रम (SEEUY)
(4) ग्रामीण गरिबांसाठी स्वयंरोजगार
उत्तर :
प्र.३९. खालील विधाने विचारात घ्या :
अ.1976 मध्ये, सामान्य लेखा खाते नियंत्रण नावाच्या संस्थेची स्थापना झाली.
ब.सामान्य लेखा नियंत्रण संख्या ही संघीय सरकारच्या विनियोग खाते आणि वित्तीय खाते यांची संक्षिप्त रचना तयार करते.
क.सामान्य लेखा खाते नियंत्रण संस्थेचे विनियोग लेखा परीक्षण आणि नियामक लेखा परीक्षण करण्याचे वैधानिक कर्तव्य आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
(1) अ आणि ब
(2) फक्त अ
(3) ब आणि क
(4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :
प्र.४०. खालीलपैकी कोणते राजकोषिय धोरणाचे साधन/साधने आहे/आहेत ?
अ.विदेशी गुंतवणूक
ब.कर
क.सार्वजनिक खर्च
क.बँक दर धोरण (BRP)
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ
(2) ब आणि क
(3) अ आणि ड
(4) फक्त ड
उत्तर :
प्र.४१. खालील विधाने विचारात घ्या :
अ.ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागामध्ये स्वयम् रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे.
ब.स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेचे उद्दिष्टे शहरी भागामध्ये स्वयम् रोजगार आणि वेतन रोजगार या दोन्ही मध्ये रोजगार संधी निर्माण करणे आहे.
क.ऑगस्ट 2011 मध्ये संसदेत पास केलेला नवीन कायदा महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कायदा म्हणून ओळखला जातो.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
पर्यायी उत्तरे :
(1) अ आणि क
(2) ब आणि क
(3) अ आणि ब
(4) वरील सर्व
उत्तर :
प्र.४२. लोकसंख्या संक्रमण सिद्धांता अनुसार खालील विधाने विचारात घ्या :
अ.पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन आणि मागासलेली असते.
ब.दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्येची वृद्धी जलद होते.
क.तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण आणि औद्योगीकरण जलद होते.
ड.1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
पर्यायी उत्तरे :
(1) अ आणि ब
(2) ब आणि क
(3) क आणि ड
(4) वरील सर्व
उत्तर :
प्र.४३. खालीलपैकी कोणते वाक्य/वाक्ये योग्य आहे/आहेत ?
अ.लेखापरिक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार (Transaction) तपासू शकत नाही.
ब.लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम / निर्णायक स्वरूपाचा नसतो.
क.लेखापरिक्षक तज्ञावर विश्वास ठेवून असतो.
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ
(2) ब आणि क
(3) फक्त क
(4) अ, ब आणि क
उत्तर :
प्र.४४. खालील विधाने विचारात घ्या :
अ.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल, 1935 रोजी झाली.
ब.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण 1950 मध्ये झाले.
क.भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून एक रुपयेची नोट आणि सर्व परिमाण नाणी जारी केली जातात.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
(1) अ आणि ब
(2) ब आणि क
(3) फक्त क
(4) फक्त ब
उत्तर :
प्र.४५. खालील विधाने विचारात घ्या :
अ.विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी स्थापना केली.
ब.वित्त मंत्री श्री नरसिंहराव यांनी 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण जाहीर केले.
क.सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
पर्यायी उत्तरे :
(1) अ आणि ब
(2) ब आणि क
(3) अ आणि क
(4) वरील सर्व
उत्तर :
प्र.४६. जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले, तर त्यांच्या परिणामी रोध 45 Ω होतो आणि जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांच्या परिणामी रोध 10 Ω होतो, तर त्या रोधाच्या किंमती किती ?
(1) 10 Ω, 45 Ω
(2) 10 Ω, 30 Ω
(3) 15 Ω, 30 Ω
(4) 10 Ω, 45Ω
उत्तर :
प्र.४७. पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण 'प्रिझम' मधून गेले असता, त्याच्यात समाविष्ट असणाऱ्या रंगाच्या किरणांमध्ये किंवा तरंगलांबी मध्ये वेग-वेगळे (seperated) होतात. या दृक चमत्काराला __________ म्हणतात.
(1) प्रकाशाचे परावर्तन
(2) प्रकाशाचे अपवर्तन
(3) प्रकाशाचे अपस्करण
(4) प्रकाशाचे विवर्तन
उत्तर :
प्र.४८. जर 0.2 A इतकी विद्युतधारा 100 Ω रोध असलेल्या तारेच्या विद्युतइस्त्री मधून एका मिनीटासाठी प्रवाहित केली, तर किती ज्यूल उष्मा निर्माण होईल ?
(1) 24 Joules
(2) 240 Joules
(3) 2400 Joules
(4) 24000 Joules
उत्तर :
प्र.४९. प्रदीर्घ आवर्त सारणीत __________ ह्या दोन मुलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो.
(1) B आणि Si
(2) Li आणि Mg
(3) Be आणि Al
(4) वरीलपैकी सर्व
उत्तर :
प्र.५०. एका 257 g वजनाच्या चेंडूचा वेग 257 m/s असेल तर त्याची तरंगलांबी _______ m इतकी असते.
दिले गेले आहे : h=6.626x10-34 J/s
(1) 10-35
(2) 10-32
(3) 10-38
(4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर :
प्र.५१. इथिलिनच्या रेणू मध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात ?
(1) 3
(2) 5
(3) 2
(4) 1
उत्तर :
प्र.५२. खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रीय पातळीचे संघटन आढळले ?
(1) पॉरीफेरा
(2) आदिजीव (प्रोटोझोआ)
(3) चपटकृमी (प्लॅॅटीहेलमिंथिस)
(4) सिलेंटराटा
उत्तर :
प्र.५३. झुरळांच्या उदरामध्ये टरगा (T) आणि स्टरना (S) यांचा खरा क्रम हा आहे.
(1) T - 10, S - 10
(2) T - 9, S - 9
(3) T - 9, S - 10
(4) T - 10, S - 9
उत्तर :
प्र.५४. मॅॅलीयस्, इनकस् आणि स्टॅॅप्स् यांना असे सुध्दा म्हणतात.
(1) इयर ऑस्सिकल
(2) ऑडिटरी वेसिकल
(3) बोनी इयर
(4) ऑडिटरी बोन्स्
उत्तर :
प्र.५५. पिवळ्या-हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना __________ असे संबोधतात.
(1) क्लोरोफायसी
(2) सायनोफायसी
(3) फियोफायसी
(4) झॅॅन्थोफायसी
उत्तर :
प्र.५६. म्युकोरेल्स या कवकवर्णीय वनस्पतींना _________ असे म्हणुन ओळखतात.
(1) ब्लॅॅक मोल्डस
(2) ब्लू मोल्डस
(3) ग्रीन मोल्डस
(4) यलो मोल्डस
उत्तर :
प्र.५७. बंचीटॉप हा रोग विशेषतः कोणत्या पीकांमध्ये आढळतो ?
(1) पपई
(2) लिंबु
(3) ऊस
(4) केळी
उत्तर :
प्र.५८. यु.आय.पी. भारतामध्ये 1985 सालापासून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राबविण्यास सुरुवात केली आहे. यु.आय.पी. खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे संक्षिप्त रुप आहे ?
(1) युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम
(2) युनिक आयडेंटिफिकेशन प्रोग्राम
(3) युनायटेड इंडियन पाॅॅलिसी
(4) वरीलपैकी कोणताही पर्याय नाही
उत्तर :
प्र.५९. 12 ड ही प्रकिया अन्नावर केल्यास ____________
(1) उष्णतेची प्रक्रिया जी 12 जिवाणू मारते.
(2) प्रक्रिया करून अन्न साठविण्याच्या 12 (बारा) विविध पद्धती
(3) क्लाॅॅस्ट्रिडियम बाॅॅट्यूलिनम (Clostridium botulinum) चा अंतर्गोलाच्या संख्येत 1012 पटीने कपात होते.
(4) कोणतीही प्रक्रिया जी अधिक तापमानाला जिवंत राहणाऱ्या जंतूचा नाश करते.
उत्तर :
प्र.६०. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रीनोजेनचे फायब्रिनमध्ये रुपांतर होते
(1) हा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आहे व यात अनेक घटकांचा सहभाग आहे
(2) फायब्रीनोजेन (Fibrinogen) फुटलेल्या रक्तबिंबिकेतून बाहेर टाकले जाते
(3) ह्याचा संबंध उच्च रक्तदाबाशी असल्याने रोहिणीच्या भिंत्तीना इजा पोहोचू शकते
(4) हिमोफिलीया हा आजार असलेल्या व्यक्तींमध्ये हा त्रास होऊ शकतो
उत्तर :
पुढील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करुन प्रश्नांचे उत्तर द्या.
N, U, E, G, I, S आणि X हे सात विद्यार्थी वेगवेगळ्या तीन कॉलेजमध्ये शिकत आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये किमान दोघे शिकत आहेत. इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांपैकी प्रत्येकाचा एक विषय आवडता आहे. आवडता विषय याच क्रमाने असण्याची गरज नाही.
E याचा आवडता विषय भौतिकशास्त्र आहे आणि तो फक्त N बरोबर नंबर दोन कॉलेज मध्ये शिकतो. I हा नंबर दोन कॉलेजमध्ये शिकत नाही आणि त्याला इंग्रजी आवडतो. G हा नंबर तीन कॉलेजमध्ये शिकतो आणि त्याला गणित आवडत नाही. ज्यांना भूगोल व रसायनशास्त्र आवडतात, ते एकाच कॉलेजमध्ये शिकतात. X ला जीवशास्त्र आवडते आणि तो नंबर एक कॉलेजमध्ये शिकत नाही. S हा I बरोबर शिकत नाही. S ला रसायनशास्त्र आवडत नाही. N ला इतिहास आवडत नाही.
प्र.६१. S कोणत्या कॉलेजमध्ये शिकतो ?
(1) नंबर एक
(2) नंबर दोन
(3) नंबर तीन
(4) निश्चित सांगता येत नाही
उत्तर :
प्र.६२. एका सांकेतिक भाषेत LANGUAGE हा शब्द NDPJWDIH असा लिहतात. तर OFFICIAL हा शब्द याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल ?
(1) QIILELCM
(2) QIHLELCO
(3) QIILEJCM
(4) QIHLEKCO
उत्तर :
प्र.६३. जर तिन्ही आकृत्यांत एकाच नियमांचे पालन केले असेल तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.
(1) 11
(2) 14
(3) 10
(4) 7
उत्तर :
प्र.६४. पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल ?
26, 50, 82, ?
(1) 122
(2) 170
(3) 145
(4) 101
उत्तर :
प्र.६५. दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
11, 5, 20, 12, 38, ?, 74, 54
(1) 42
(2) 32
(3) 26
(4) 22
उत्तर :
प्र.६६. A, B, C, D आणि E हे उत्तरेकडे तोंड करून मैदानात उभे आहेत. त्यांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे :
अ.D च्या उजव्या बाजूस 40 मी. वर B आहे.
ब.B च्या दक्षिणेस 60 मी. वर A आहे.
क.D च्या पश्चिमेस 25 मी. वर C आहे.
ड.A च्या उत्तरेस 90 मी. वर E आहे.
तर B च्या डाव्या बाजूस जो आहे, त्याच्या ईशान्य दिशेला कोण आहे ?
(1) A
(2) C
(3) D
(4) E
उत्तर :
प्र.६७. जर PEN = 70, BOOK = 86 असेल तर DUSTER = किती ?
(1) 174
(2) 184
(3) 186
(4) 188
उत्तर :
प्र.६८. एक व्यक्ती रेल्वेपूलावर उभी असून त्या पूलाची लांबी 180 मी. आहे. एक आगगाडी त्या व्यक्तीस 8 सेकंदात व पूलास 20 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी व वेग शोधा.
(1) 115 मी. आणि 15 मी./से.
(2) 120 मी. आणि 10 मी./से.
(3) 110 मी. आणि 15 मी./से.
(4) 120 मी. आणि 15 मी./से.
उत्तर :
प्र.६९. खालील चौकोनाकृती ठोकळ्याच्या अवस्थांचे निरीक्षण करा आणि 1 विरुद्ध बाजूचा अंक शोधा.
(1) 2
(2) 4
(3) 5
(4) 3
उत्तर :
प्र.७०. 1600 चे 60 टक्के हे क्ष च्या 80 टक्क्यांइतके आहेत. तर क्ष ची किंमत किती ?
(1) 1000
(2) 1200
(3) 1400
(4) 1600
उत्तर :
प्र.७१. एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. टाकीच्या तळाला गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल, तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल ?
(1) 24 तास
(2) 16 तास
(3) 12 तास
(4) 10 तास
उत्तर :
प्र.७२. दोन जहाजे A व B हे एकमेकांपासून 155 सागरी मैल अंतर असलेल्या दोन बेटांवरून प्रवास सुरु करतात. जहाज A हे B च्या पश्चिमेला असून ते पूर्वेकडे प्रति तास 25 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरु करते. त्याचवेळेस जहाज B हे दक्षिणेकडे प्रति तास 20 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरु करते. ३ तासांच्या प्रवासानंतर त्या जहाजांमधील अंतर किती ?
(1) 120 सागरी मैल
(2) 100 सागरी मैल
(3) 90 सागरी मैल
(4) 80 सागरी मैल
उत्तर :
प्र.७३. २० मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास करून किती दिवसात पूर्ण करतील ?
(1) 12 दिवस
(2) 15 दिवस
(3) 20 दिवस
(4) 18 दिवस
उत्तर :
प्र.७४. x आणि y व्यस्त चलनात आहेत.
जेव्हा x = 3 तेव्हा y = 4 असतात.
जर x = 9 असेल तर y ची किंमत किती ?
(1) 3/4
(2) 3/7
(3) 5/3
(4) 4/3
उत्तर :
प्र.७५. काजूची किंमत प्रतिकिलो ₹ 1,000 तर पिस्त्याची किंमत प्रतिकिलो ₹ 1,200 आहे. जर काजू व पिस्त्याचे मिश्रण प्रतिकिलो ₹ 1,050 विकले, तर त्या मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण किती ?
(1) 1:3
(2) 2:1
(3) 3:1
(4) 3:2
उत्तर :
प्र.७६. नुकतीच भारतीय नौदलात समाविष्ट पाणबुडी आई.एन.एस. कलवरी कोणत्या देशाच्या सहकार्याने निर्माण केली गेली ?
(1) अमेरिकेची संयुक्त संस्थाने
(2) जपान
(3) फ्रान्स
(4) इस्त्रायल
उत्तर :
प्र.७७. या वर्षीचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पाचवा "बैलन डी'ओर" पुरस्कार मिळविणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या पुढीलपैकी कोणत्या क्लबकडून खेळतो ?
(1) एफ.सी.बार्सिलोना
(2) जुवेंटस
(3) रीअल माद्रीद
(4) ए.सी.मिलान
उत्तर :
प्र.७८. अलिकडेच फेब्रुवारी 2018 फायनान्शियल टेक्नोलॉजी (फिनटेक) धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
(1) महाराष्ट्र
(2) आंध्र प्रदेश
(3) कर्नाटक
(4) गुजरात
उत्तर :
प्र.७९. भारतातील कोणत्या शहरात ग्लोबल एंटरप्रिन्योरशिप समिट, 2017 आयोजित करण्यात आले ?
(1) मुंबई
(2) हैदराबाद
(3) नवी दिल्ली
(4) वाराणसी
उत्तर :
प्र.८०. कोणत्या देशाच्या संघास हरवून फ्रान्सने दहावा डेव्हीस कप जिंकला ?
(1) जर्मनी
(2) इटली
(3) सं.रा.अमेरिका
(4) बेल्जियम
उत्तर :
प्र.८१. खालीलपैकी कोणत्या आय.ए.एस. अधिकाऱ्याची भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) च्या महासंचालकपदी नुकतीच (जाने. 2018) नियुक्ती करण्यात आली ?
(1) पोमा तुडु
(2) सुरेंद्र कुमार सोलंकी
(3) दीपक कपूर
(4) नीलम कपूर
उत्तर :
प्र.८२. 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मध्ये कोणत्या चित्रपटास 'स्वर्ण मयूर' पुरस्कार प्राप्त झाला ?
(1) एंजेल्स वियर व्हाईट
(2) टेक ऑफ
(3) क्षितिज
(4) 120 बीट्स पर मिनिट
उत्तर :
प्र.८३. 2017 सालच्या IFFI तर्फे दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी कोण ?
(1) अॅॅटम इगोयान
(2) व्हिवियन क्यू
(3) अमिताभ बच्चन
(4) किरो रुसो
उत्तर :
प्र.८४. 'तपी' प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
(1) जलविद्युत प्रकल्प
(2) पेट्रोलियम पुरवठा
(3) पाइपद्वारे नैसर्गिक वायुपुरवठा प्रकल्प
(4) अणुऊर्जा प्रकल्प
उत्तर :
प्र.८५. 'सौभाग्य' योजना कशाशी संबंधित आहे ?
(1) प्रत्येक घरात वीज
(2) उत्कृष्ट वाहतुक
(3) अधिक चांगले रस्ते
(4) बँक क्षेत्रातील सुधारणा
उत्तर :
प्र.८६. पुढील विधानांचा विचार करुन योग्य पर्याय निवडा :
अ.माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे या वर्षासाठी इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास या पुरस्काराचे मानकरी आहेत.
ब.त्यांना हा पुरस्कार "जागतिक स्तरावर भारताचे स्थान सुधारण्यासाठी" आणि भारताच्या 'आर्थिक, सामाजिक विकासासाठी योगदान देण्यासाठी" मिळाला आहे.
क.सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली.
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ
(2) फक्त ब
(3) अ आणि ब दोन्हीही
(4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :
प्र.८७. स्पेसएक्सच्या खाजगी मंगळयान मोहिमेसाठी खालीलपैकी कोणता प्रक्षेपक पाठविण्यात आला आहे ?
(1) टेस्ला
(2) स्पेसएक्सेल
(3) फाल्कन हेवी
(4) मार्स-वन
उत्तर :
प्र.८८. बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांदरम्यान धावते ?
(1) भारत - नेपाळ
(2) भारत - पाकिस्तान
(3) भारत - बांग्लादेश
(4) भारत - भूतान
उत्तर :
प्र.८९. सरकारी योजनांचे सामाजिक लेखापरीक्षण हा शासनाच्या कामकाजाच्या भाग करणारा कायदा प्रथम अमलात आणणारे राज्य कोणते ?
(1) गोवा
(2) मेघालय
(3) कर्नाटक
(4) महाराष्ट्र
उत्तर :
प्र.९०. येशी धोंडेन यांना भारत सरकारने नुकतेच पद्मश्री देवून गौरविले. _________ क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पद्मश्री देण्यात आली ?
(1) तिबेटीयन वनौषधी
(2) नवजात अर्भकांचे आजार
(3) सर्पदंशावरील उपचार
(4) दुर्गमडोंगरी भागात दवाखाना चालवणे
उत्तर :
प्र.९१. खालीलपैकी कोणत्या पाणीवाटप तंट्यामध्ये कर्नाटकाचा समावेश नाही ?
(1) वंशधारा पाणीवाटप तंटा
(2) गोदावरी पाणीवाटप तंटा
(3) महादयी पाणीवाटप तंटा
(4) कृष्णा पाणीवाटप तंटा
उत्तर :
प्र.९२. डॉ. बी.आर.आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाच्या आत्मा मानले आहे ?
(1) कलम 19
(2) कलम 21
(3) कलम 51
(4) कलम 32
उत्तर :
प्र.९३. भारताच्या संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोड्यांपैकी कोणती जोडी अयोग्य आहे, ते ठरवा.
(1)जंगले- समवर्ती सूची
(2)स्टॉक एक्सचेंज- समवर्ती सूची
(3)पोस्ट ऑफिस बचत बँक- केंद्र सूची
(4)सार्वजनिक आरोग्य- राज्य सूची
उत्तर :
प्र.९४. विजय गोखले यांची भारताच्या परराष्ट्र सचिव पदी नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(1) गोखले हे भारतीय परराष्ट्र सेवेच्या 1981 च्या तुकडीचे अधिकारी आहेत.
(2) गोखले हे चीनविषयक प्रश्नांचे तज्ञ मानले जातात.
(3) परराष्ट्र सचिवपद भूषविणारे ते दुसरे मराठी अधिकारी आहेत.
(4) गोखले हे मुळचे मुंबईकर आहेत.
उत्तर :
प्र.९५. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?
(1) बी.एन.राव
(2) एन.गोपालस्वामी अय्यंगार
(3) श्यामा प्रसाद मुखर्जी
(4) एम.आर.जयकर
उत्तर :
प्र.९६. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांच्या भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?
(1) 42 वी दुरुस्ती
(2) 44 वी दुरुस्ती
(3) 61 वी दुरुस्ती
(4) 24 वी दुरुस्ती
उत्तर :
प्र.९७. संसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार संमत केला आहे ?
(1) 44 वी घटनादुरुस्ती कायदा
(2) 52 वी घटनादुरुस्ती कायदा
(3) 42 वी घटनादुरुस्ती कायदा
(4) 61 वी घटनादुरुस्ती कायदा
उत्तर :
प्र.९८. खालील विधाने विचारात घ्या :
अ.एम.सी.सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते.
ब.महान्यायवाद्यास भारताच्या सर्व न्यायालयांत उपस्थित रहाण्याचा अधिकार आहे.
क.महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात सहभागी होतो. त्याला तेथे बोलणे व मत देण्याचा अधिकार आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चूक आहेत ?
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ
(2) अ आणि क
(3) फक्त क
(4) वरील सर्व
उत्तर :
प्र.९९. केन्द्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे ?
(1) अनुच्छेद 325
(2) अनुच्छेद 320
(3) अनुच्छेद 318
(4) अनुच्छेद 315
उत्तर :
प्र.१००. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते ?
(1) अनुच्छेद 75
(2) अनुच्छेद 74
(3) अनुच्छेद 73
(4) अनुच्छेद 76
उत्तर :